बिहार निवडणुकीतील देशात भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचं सत्र सुरू आहे. देशातील काही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. आपले इरादे पूर्ण होतील असं त्यांना वाटत आहे. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मला इशारा देण्याची गरज नाही कारण ते काम जनता करेल. निवडणुकीत विजय, पराभव होत असतो; पण लोकशाहीत हे चालणार नाही. मृत्यूचा खेळ खेळून मतं मिळणार नाहीत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. भरघोस यशानंतर दिल्लीमध्ये भाजपाकडून जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय तसंच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत आभार मानले. यावेळी नरेंद्र मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. मृत्यूचा खेळ खेळून मतं मिळणार नाहीत असंही ते यावेळी ते म्हणाले आहेत. लोक आमचा सामना करु शकत नाहीत त्यांनी सध्या नवा मार्ग अवलंबला आहे.
देश के कुछ हिस्सों में उनको लगता है कि भाजपा के कार्यकर्ताओं को मौत के घाट उतार कर वे अपने मनसूबे पूरे कर लेंगे।
मैं उन सभी से आग्रह पूर्वक समझाने का प्रयास भी करता हूं।
मुझे चेतावनी देने की जरूरत नहीं है, वो काम जनता-जर्नादन करेगी।
– पीएम @narendramodi pic.twitter.com/H46AL3GM8M
— BJP (@BJP4India) November 11, 2020
बिहारमधील यशावर भाष्य
ही निवडणूक करणं सोप्प नव्हतं. पण, आपण जगाला भारताची ताकद या माध्यमातून दाखून दिली आहे. एकाही मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणी झालेली नाही ही खऱ्या अर्थाने देशाची ताकद बनली आहे. आधी बिहारमध्ये निवडणूक झाली, की किती मतदारसंघ लुटले, किती ठिकाणी पुन्हा मतमोजणी होणार अशा बातम्या येत; पण आता निवडणूक किती वाढले अशा बातम्या प्रसारित होताना पहिल्या मिळतात. लोकसभा निवडणुकीतील जे निकाल आले त्याचा हा व्यापक विस्तार आहे. भाजपा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे ज्याचा झेंडा संपूर्ण देशवासियांनी देशभर फडकावला याचाच अर्थ भारताच्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाच्या ह्रदयात आपण पोहोचलो आहोत. नरेंद्र मोदींनी यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना विजयाचं श्रेय देत ‘जे पी नड्डाजी आगे बढो, हम आपके साथ है’ अशी घोषणाही दिली.
“देशाचा आणि राज्याचा विकास हाच निवडणुकीचा मुख्य आधार आहे. भविष्यातही राहणार ज्या लोकांना अद्यापही हे कळलं नाही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे,” असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला. “देशाच्या विकासाचं काम करेल त्यालाच सेवा करण्याची संधी मिळेल हे या निवडणुकीतून जनतेने दाखून दिलं आहे. विकास हाच मुख्य मुद्दा आहे. देशहिताची प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आणि प्रत्येक निर्णय घेणार. तसंच इतर राजकीय पक्षांनाही देशहिताचं काम करण्याचा संदेश दिला आहे. बिहारमधील निकालावर माझी प्रतिक्रिया निकालाप्रमाणे साफ आहे. बिहारमधील यशाचं रहस्य सांगायचं झालं तर हा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हेच आहे. बिहारमधील जनता जागरुक आहे. हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं.
देशातील तरुणांनी पुढे येऊन भाजपाच्या माध्यमातून देशसेवा करावी. तसंच, देशातील नारी शक्ती याच आमच्या सायलेंट व्होटर आहेत. ग्रामीण ते शहरापर्यंत महिला मतदार याच भाजपाचे सायलेंट व्होटर ठरले आहेत. देशातील तरुणांनी पुढे येऊन भाजपाच्या माध्यमातून देशसेवा करावी ” असं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी तरुणाईला केलं.