बहुजननामा ऑनलाईन- तामिळनाडूतील एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवारासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रित केले आहे. वेल्लोर येथे राहणारे माजी वैद्यकीय संशोधक आणि पर्यवेक्षक टी. एस राजशेखरन यांच्या मुलीचा ११ सप्टेंबर रोजी विवाहसोहळा होणार आहे. मुलगी राजश्रीच्या लग्नात त्यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजशेखरन यांच्या कुटुंबाला अशी अपेक्षा नव्हती की त्यांना पीएमओकडून आपण पाठविलेल्या आमंत्रणाला प्रत्युत्तर मिळेल. राजशेखरन यांनी मुलीच्या लग्नाच्या आमंत्रणावर शनिवारी (ता.७) या कुटुंबाला पीएम मोदी यांचे एक पत्र आले. यात राजश्री आणि डॉ. सुदर्शन यांच्या विवाहाच्या पवित्र मंगलमय प्रसंगी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदमय असो. या आशयाचे पत्र राजशेखरन यांना मिळाले.
पंतप्रधानांचे कार्यक्रम आधीच ठरलेले असतात. त्यांचे विवाहसोहळ्याला येणे शक्य नाही हे माहित असतानाही त्यांच्या आमंत्रणाचे उत्तर त्यांना मिळाल्याने राजशेखर यांचे कुटुंबीयांना फार आनंद झाला आहे. मोंदीकडून आलेल्या या पत्राची फ्रेम बनविणार असल्याची इच्छाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता.११) मथुरा येथे राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम (एनएडीसीपी) सुरू करणार आहे. या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली.