नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर आरोप लावत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बोलताना तेथील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यादरम्यान त्यांनी नाव न घेता राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, कटमनीच्या अभावामुळे आणि सिंडिकेट चालत नसल्यामुळे केंद्र सरकारच्या या योजना राज्य सरकार राबवत नाही. तसेच मोदींनी कोलकाता बंदराचे नाव डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
The great land of Bengal has provided intellectual leadership to our nation. pic.twitter.com/59oeHXVzSH
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2020
मोदी हे पश्चिम बंगालच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त तेथे मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या तरुणांना उद्देशून ते सीएए समजून घेत असून विरोधी पक्षाला मात्र हे प्रकरण समजूनच घ्यायचे नाही, असे मोदी म्हणाले.
#WATCH West Bengal: Prime Minister Narendra Modi meets saints and seers at Belur Math,Howrah pic.twitter.com/V8rGenECS5
— ANI (@ANI) January 12, 2020
पुढे त्यांनी आकाशात एकच चंद्र असतो. पण जगात देशाला चमकवण्यासाठी बंगालने अनेक चंद्र दिले असल्याचे म्हणाले. तसेच मोदींनी सुभाष चंद्र, जगदीश चंद्र, केशवचंद्र, विपिन चंद्र, बंकिमचंद्र, ईश्वरचंद्र असे डझनभर चंद्र दिले असून त्यांनी देशाला जागतिक स्तरावर नेल्याचे सांगितले. पुढे त्यांनी स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यांनी जगाला जागृत करण्याचे काम केले असल्याचे म्हटले.