नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत यावर्षी शेतकऱ्यांना ५३ हजार कोटींची आणखी मदत मिळणार आहे. मोदी सरकार ही रक्कम २४ फेब्रुवारी २०२० च्या आधी शेतकरी बँक खात्यात ठेवण्याची तयारी करत आहे. दरम्यान या योजनेची सुरुवात २४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झाली होती. म्हणूनच या तारखेपूर्वी सरकारकडे शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करणार आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ३४ हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती भारतीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
१५ नोव्हेंबरपर्यंत ७ कोटी ८७ लाख शेतकर्यांना लाभ झाला आहे.दरम्यान पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी आधार क्रमांक जोडण्याची मोदी सरकारने ३० नोव्हेंबर २०१९ ची तारीख निश्चित केली आहे. या काळात जर आपण लिंक केले नसेल तर शेतीला ६००० रुपये मदत मिळणार नाही. दरम्यान , जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतक्यांना ३१ मार्च २०२० पर्यंत ही संधी देण्यात आली आहे.
पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी :
– मोदी सरकार योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
– जेव्हा सरकारने ही योजना सुरू केली तेव्हा त्यामध्ये २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या १२ कोटी शेतकऱ्यांचा समावेश होता.
– पुन्हा सत्तेत आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व १४ कोटी ५० लाख शेतकर्यांना सन्मान निधी मंजूर केला.
– यानंतर योजनेचे बजेट वाढवून ८७ हजार कोटी करण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत केवळ ३४००० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
Visit : bahujannama.com