बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शेतकर्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना चालवली जात आहे. याद्वारे गरजू शेतकर्यांना 6 हजार रुपये वार्षिक थेट खात्यात ट्रान्सफर केले जातात. यावेळी सुद्धा सरकारने शेतकर्यांच्या खात्यात हप्ता पाठवला आहे. परंतु, पीएम किसान निधी योजनेतील पैशांचा लाभ काही अयोग्य व्यक्ती सुद्धा घेत आहेत. सुमारे 33 लाख अयोग्य शेतकर्यांच्या खात्यात 2,326 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.
अयोग्य लोकांकडून पैसे वसूल करणार सरकार
जे अयोग्य लोक पीएम किसानचा लाभ घेत आहेत त्यांचा शोध घेऊन राज्य सरकार प्रकरणे दाखल करत आहे. योजनेंतर्गत 32.91 लाख अयोग्य लाभार्थ्यांच्या खात्यात 2,326 कोटी रुपये ट्रान्सफर केले गेले आहेत. इन्कम टॅक्स भरणारे काही लोक योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देशातील 11 कोटी 53 लाख लाभार्थ्यांना मिळत आहे.
कोण नाही किसान योजनेसाठी पात्र
* जे शेतकरी शेतजमिनीचा वापर कृषीशिवाय इतर कामासाठी करत आहेत.
* जे दुसर्यांच्या शेतात काम करतात ते सुद्धा लाभ घेऊ शकत नाहीत.
* कृषी जमिनीचा मालक सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्त झाला असेल.
* एखाद्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स पेयर असेल.
* शेत जमिन शेतकर्याच्या नावावर नसेल.
* शेती वडील किंवा आजोबांच्या नावावर असेल तरी योजनेचा लाभ मिळणार नाही.