नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दरवर्षी मोदी सरकार शेतकऱ्यांना ६ हजार रुपये २ हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये देतं. एप्रिल ते जुलैच्या पहिला हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे अजून कोणी शेतकरी या योजनेत नाव नोंदी करावयाचे राहिले असल्यास ३० जूनपर्यंत नोंदणी करणे शक्य आहे. या योनेतर्गत प्रत्येक वर्षीचा पहिला हप्ता एक एप्रिल ते ३१ जुलै, दुसरा एक ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर आणि तिसरा १ डिसेंबर ते ३१ मार्चच्या दरम्यान जमा होतो.या वर्षी दोन्ही हप्ते एकदम दिले जाणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
ही कागदपत्रे द्यावी लागतील –
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. कारण योजनेतील हप्ता थेट बँकेत जमा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आपले बँक खाते आधारशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. कर्ण आता या योजनेत काही बदल करण्यात आले आहे. ते म्हणजे पूर्वी पहिली रक्कम जमा करताना बँक खात्याशी आधार जोडणे गरजेचे नव्हते, पण आता त्याची आवश्यकता आहे. यातून आसाम मेघालय, जम्मू आणि काश्मीरला सूट देण्यात आली आहे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर आपली कागदपत्रं अपलोड करू शकता. यानंतर तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं असल्यास त्यासाठी तुम्ही एडिट आधार डिटेलच्या पर्यायावर क्लिक करुन अपडेट करू शकता.
असे तपासा यादीतील आपले नाव
यादीत आपले नाव तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा वापराव्यात. सुरुवातीला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in वर भेट द्या. होमपेजवरच आपल्याला Farmers Corner हा पर्याय दिसेल त्या मध्ये गेल्यानंतर Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर ड्रॉप डाउन लिस्टमध्ये राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडावं लागेल. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर संपूर्ण लाभार्थ्यांची यादी मिळेल त्यातून आपल्याला आपले नाव शोधता येईल.