नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM kisan |पीएम किसान सन्मान निधी (PM kisan samman nidhi) चा फायदा घेणार्यांसाठी चांगली बातमी आहे. जर तुम्ही अगोदरपासून सन्मान निधी योजेनचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सरकारकडून दर महिना 3000 रुपये मिळवण्याचा सुद्धा हक्क आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही कागदपत्रे द्यायची नाहीत. पीएम किसान मानधन योजनेंतर्गत (PM kisan Man dhan Yojna) शेतकर्यांना दरवर्षी 36000 रुपये मिळू शकतात.
जाणून घ्या कसे मिळतील 36000 रुपये?
पीएम किसान मानधन योजनेंतर्गत छोट्या आणि सीमांत शेतकर्यांना दर महिन्याला पेन्शन देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षाच्या वयानंतर दर महिना 3000 रुपये म्हणजे वर्षाचे 36000 रुपये शेतकर्यांना पेन्शन दिली जाते.
जमा करावे लागणार नाहीत कागदपत्र
जर तुम्ही पीएम किसानचा फायदा घेत असाल तर यासाठी कोणतीही जादा कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही.
कोण घेऊ शकतात योजनेचा फायदा
- 18 ते 40 वर्षापर्यंतचा कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो.
- यासाठी तुमच्याकडे कमाल 2 हेक्टेरपर्यंत शेतीयोग्य जमीन असावी.
- किमान 20वर्ष आणि कमाल 40 वर्षापर्यंत 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मासिक अंशदान करावे लागेल, शेतकर्याच्या वयावर अवलंबून आहे.
- If 18 व्या वर्षी सहभाग घेतला तर मासिक अंशदान 55 रुपये असेल.
- जर 30 व्या वर्षी सहभाग घेतला तर 110 रुपये जमा करावे लागतील.
- जर तुम्ही 40 च्या वयात सहभागी झालात तर दरमहिना 200 रुपये जमा करावे लागतील.