बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महाराष्ट्रात परीक्षा घ्याव्यात की नाही? त्या ऑनलाईन की ऑफलाईन? यावर चर्चा सुरू असून सरकारी government पातळीवर सर्व घटकांना विचारात घेऊन निर्णय घेतले जात आहेत. तर दुसरीकडे मात्र पुद्दुचेरी सरकारने government मात्र इयत्ता 11 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इयत्ता 1 ली ते 11 वी तील सर्वच विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेविनाच उत्तीर्ण करण्याच्या प्रस्तावाला पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी मान्यता दिली आहे . पुद्दुचेरी प्रशासनाकडून 1 ली ते 11 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्यपाल तमिलसई सुंदरराजन यांच्याकडे पाठवला होता. त्यावर आता राज्यपालांनी मान्यता दिल्याने पुद्दुचेरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सुखद धक्काच ठरला आहे.
काही दिवसांपूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी राज्यातील 9 वी,10 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवायच उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला. सहामाही आणि तिमाही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे त्यांना गुण देऊन पास केले जाणार आहे. यावेळी 10 वीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करणे चुकीच ठरेल, अशी टीकाही झाली होती. आता याच निर्णयाच्या आधारे पुद्दुचेरीमधील 10 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांना देखील पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुद्दुचेरीतील 1 ली ते 9 वीच्या विद्यार्थ्यांना देखील थेट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत शाळेच्या तासिकांना नियमितपणे हजर राहावे लागणार आहे. 1 एप्रिलपासून या विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील, असे पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.