बहुजननामा ऑनलाइन टीम : ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. असे असताना केंद्र सरकारने 2021 च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर करीत प्रक्रियाही सुरू केलेली आहे. या विरोधात अॅड. अंजली साळवे-विटणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर धाव घेऊन मध्यस्थी अर्ज दाखल करुन जनगणना 2021ला आव्हान दिले आहे.
2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्याने अॅड. अंजली साळवे-विटणकर यांनी ‘जनगणना २०११ मध्ये सहभाग नाही’ अशा पाट्या घरावर लावण्याची मोहिमच संविधान दिनापासून उघडली आहे. ही मोहिम त्यांनी आपल्या घरापासून सुरू केलेली आहे. या मोहिमेचे लोन आता चंद्रपूर जिल्ह्यातील पसरले आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या घरासमोर सदर आशयाच्या पाट्या लावून जनगणना 2021 मध्ये ओबीसी जनगणनेच्या कॉलमची मागणी केली आहे.
ही मोहीम सुरू करतानाचा समस्त ओबीसी बांधवांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते तसेच ओबीसी जनगणनेच्या प्रश्नाकडे संसद अधिवेशनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी संबंधित खासदारांना ओबीसी संघटनांनी निवेदन देण्याचे आवाहनही करण्यात आले होते. या आवाहनाला चंद्रपूर जिल्ह्यातूनही खूप प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. चंद्रपूर, बल्लारपूर व राजुऱ्यासह अन्य तालुक्यातील काही घरांवर ‘जनगणना 2011 मध्ये सहभाग नाही.’ अशा आशयाच्या पाट्या लावण्यात आल्या आहे. या पाट्यांमुळे ओबीसी जनगणनेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
Visit : bahujannama.com