अलीगढ : वृत्तसंस्था – महिलांसंबंधीचे (Womens) वाढत असलेले गुन्हे नेहमी मोठी समस्या राहिली आहे, सातत्याने या मुद्द्यावर समाजात काम करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी (Meena Kumari) यांचे म्हणणे आहे की, महिलांसंबंधीचे (Womens) गुन्हे वाढण्याचे कारण त्यांचे मोबाइल फोन (Phone Crime Against Womens ) वापरणे आहे.
मुली तासनतास मुलांसोबत मोबाईलवर बोलतात
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलीगढमध्ये आल्या असताना मीना कुमारी यांनी वक्तव्य केले की,
महिलांच्या (Womens) बाबतीत वाढत असलेल्या गुन्ह्यांवर समाजाला स्वता गंभीर व्हावे लागेल.
अशा प्रकरणात मोबाइल (Phone) एक मोठी समस्या बनली आहे,
मुली तसानतास मोबाइलवर (Phone) बोलत असतात…मुलांसोबत उठतात-बसतात.
मुलीेंचे मोबाईल चेक करा
मीना कुमारी यांनी म्हटले की, मुलींचे मोबाईल सुद्धा चेक केले जात नाहीत.
घरातील लोकांना माहित नसते आणि नंतर मोबाइलवर बोलता-बोलता मुलांसोबत त्या पळून जातात.
मुली बिघडण्याचे कारण मोबाईल, जबाबदारी आईची
उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्य मीना कुमारी यांनी आवाहन केले आहे की,
मुलींना मोबाईल देऊ नका आणि जर मोबाइल दिला तर त्यांचे पूर्ण मॉनिटरिंग करा.
यामध्ये आईची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि आज जर मुली बिघडल्या असतील तर त्यास त्यांच्या माताच जबाबदार आहेत.
महिलांसंबंधीचे गुन्हे हा संवेदनशील मुद्दा असताना महिला आयोगाच्या सदस्यांनी त्यासाठी अशाप्रकारे मोबाईलला आणि मुलींना जबाबदार ठरवल्याने त्यांच्या वक्तव्यावर मोठी टिका होत आहे.
कृपया हे देखील वाचा:
कोरोना प्रतिबंध लस घेणार का? बाबा रामेदव यांनी दिलं ‘हे’ उत्तर
20 लाखांचा दंड आणि उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर अभिनेत्री जुही चावला म्हणाली…(व्हिडीओ)