नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी-वद्रा यांच्यावर भडकाऊ भाषण देण्याचा आरोप लावत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हायकोर्ट या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी तयार झाले असून शुक्रवारी यावर सुनावणी होईल.
या याचिकेत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपचे आमदार अमानतुल्ला खान, एमआयएम नेता अकबरुद्दीन ओवैसी आणि वारीस पठाण यांचेही नाव शामिल आहे. यांच्या विरोधात कथित भडकाऊ भाषण दिल्यामुळे एफआयआर नोंदवायची मागणी केली आहे.
कोणी याचिका दाखल केली ?
दिल्ली हायकोर्टात याचिका सिनियर ऍडव्होकेट चेतन शर्मा यांच्याकडून दाखल केली गेली आहे. या याचिकेत त्यांनी ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केल्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी लोकांना भडकावले. भडकाऊ भाषण देऊन त्यांना रस्त्यावर उतरायला सांगितले. याप्रकारे भडकाऊ भाषण दिल्यामुळे हिंसाचाराच्या घटना बघायला मिळत आहेत,’ असे त्यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल
हायकोर्टाशिवाय सुप्रीम कोर्टातही भडकाऊ भाषणांबाबत याचिका दाखल करण्यात आली असून भाजप नेते व वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. भाजप नेत्यांनी याचिकेत लॉ कमिशननुसार भडकाऊ भाषण देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोबतच हेट स्पीचवर लॉ कमिशनची शिफारस लागू करण्याची मागणी केली आहे.
दिल्लीतील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेत्याने राष्ट्रपतींना भेट दिली. तसेच पक्षाच्या शिष्टमंडळाने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात गुरुवारी अध्यक्ष रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. राष्ट्रपतींना भेटलेल्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, प्रियंका गांधी, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला आणि इतरही नेत्यांचा समावेश होता.