बहुजननामा ऑनलाइन टीम – वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात अभिनेत्री पायल रोहतगीच्या अटकेनंतर आता तिचा साथीदार संग्राम सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. संग्राम सिंह यांनी ट्विटरवर गृह मंत्रालय, पीएमओ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत लिहिले होते की, “कॉंग्रेसच्या सत्ताधारी राज्यात हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? सर कृपया याकडे लक्ष द्या.”
पायल रोहतगी यांना राजस्थानच्या पोलिसांनी अहमदाबादहून अटक केली होती. देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोती नेहरू यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह भाष्य केले होते. पायलच्या अटकेबाबत जेव्हा सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्विट केले गेले तेव्हा पायलच्या अटकेची बातमी जास्त प्रमाणात व्हायरल झाली.
https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1206074851276083200
https://twitter.com/Sangram_Sanjeet/status/1206113584192864256
पायल रोहतगीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मोतीलाल नेहरूंवर बनवलेल्या व्हिडिओसाठी राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. मी व्हिडिओ वरून दिलेली माहिती गुगल वरून काढली होती. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य एक विनोद आहे का ?” पायलने आपले ट्विट पीएमओ इंडिया आणि गृह मंत्रालयाला टॅग केले.
सामाजिक कार्यकर्ते व युवक कॉंग्रेस नेते चर्मेश शर्मा यांनी पायल रोहतगी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. चर्मेश शर्मा यांनी आरोप केला होता की, ‘माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनाबद्दल अशा गोष्टी पोस्टमध्येही लिहल्या आहे ज्यामुळे भारताचे परराष्ट्राशी संबंध बिघडले जाऊ शकते. या पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. हे राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या विरुद्ध देखील आहे.’