हिंगोली : बहुजननामा ऑनलाईन – जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे साडेचारशे प्राध्यपकांनी वेतनासाठी निधीची तरतूद करा अन्यथा अवयव विक्री करून उदरनिर्वाहाची परवानगी द्या, अशी मागणी हिंगोली तेथे शुक्रवारी केली आहे.
प्रशासन प्राध्यापकांच्या या मागणीमुळे अडचणीत सापडले आहे. हिंगोली जिल्ह्यात ७८ कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे साडेचारशे प्राध्यापक हे ज्ञानार्जनाचे काम करतात. मात्र, गेल्या अठरा वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयाचा अनुदानाचा प्रश्न रखडल्यामुळे प्राध्यपकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे अनुदानासाठी प्राध्यापक संघटनेने वेळोवेळी निवेदन सादर केले. पण या मागण्यांकडे दुर्लक्षच करण्यात आले. दरम्यान शुक्रवारी हिंगोली जिल्हा कृती समितीचे पदाधिकाऱ्यांनी आणि प्राध्यापकांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
मागील अठरा वर्षांपासून विनावेतन काम करावे लागत आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याचे आश्वासन शासनाकडून दिले जात आहे. मात्र, आद्यपही त्याची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे वेतनासाठी अनुदान द्यावे, अन्यथा अवयव विक्री करून उदरनिर्वाहाची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सध्या प्रशासन प्राध्यापकांच्या या मागणीमुळे अडचणीत सापडले आहे.
- पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे
- घरातील सर्व प्रकारच्या स्वच्छेतेसाठी बनवा नैसर्गिक पद्धतीने घरगुती ‘क्लिनर’
- चेहऱ्यांची ‘सुंदर’ता आणि ‘चमक’ वाढविण्यासाठी हळदीचे पाणी उपयुक्त, जाणून घ्या याचा वापर
- केसातील ‘कोंड्या’पासून मुक्तीसाठी करा ‘हे’ १० घरगुती आयुर्वेदिक उपाय
- ‘अॅल्युमिनियम फॉईल’मध्ये जेवण पॅक करता, तर होऊ शकतात ‘हे’ आजार
- सावधान ! पुण्यात मुलांमध्ये विषाणूजन्य ताप, अतिसार, डेंग्यू आणि हँड-फूट-माऊथ आजाराची ‘साथ’
- त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय, जाणून घ्या