मेरठ : वृत्तसंस्था – निर्भयाचे मारेकरी आपली फाशी टाळण्यासाठी कायद्याच्या विविध डावपेचांचा आश्रय घेत आहेत. परंतु, त्यांना फासावर लटकवणार्या व्यक्तीने पूर्ण तयारी केली आहे. एकीकडे निर्भयाचे दोषी सुप्रीम कोर्टाच्या दयेची आस लावून बसलेत तर दुसरीकडे तिहार जेल प्रशासनाने मेरठचा जल्लाद पवन यास आणण्याची तयारी केली आहे. दोषी मुकेशच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा आज निर्णय आला आहे, आता उद्या पवन दिल्लीत पोहचणार आहे.
आतापर्यंत पूर्ण झालेल्या कायदेशिर प्रक्रियेत जर कोणताही बदल झाला नाही तर 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता चारही दोषींना फासावर लटकावण्यात येईल. निर्भयाच्या मारेकर्यांना फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेश जेलच्या महासंचालकांनी पवन जल्लादच्या नावावर शिक्कमोर्तब केले आहे. आता गुरूवारी सकाळी त्यास तिहर जेलमध्ये आणण्यात येईल. येथे येऊन तो फाशीची अंतिम ट्रायल सुद्धा घेणार आहे.
फाशी घरातील व्यवस्था पाहणार
तिहार जेलचे महासंचालक संदीप गोयल यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी पवन (जल्लाद) ला मेरठहून तिहार जेलमध्ये आणले जाईल. सुरक्षेच्या कारणामुळे त्यास कुठे ठेवण्यात येईल, हे सांगता येणार नाही. परंतु, हे ठरले आहे की, पवन दिल्लीत पोहचल्यावर त्यास प्रथम तिहार जेलमधील फाशी घरात आणले जाईल, जेणेकरून तिहार जेलने दोषींना फाशीसाठी केलेली तयारी योग्य आहे का, हे तो पाहणी करून सांगू शकेल.
कडेकोट बंदोबस्तात येणार
पवन जल्लाद मेरठहून दिल्लीला कोणत्या रस्त्याने येणार ? कोणत्या वेळी आणि कोणाच्या सुरक्षेत आणण्यात येणार ? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तिहार जेल महासंचालकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नकार दिला. तर दुसरीकडे सूत्रांनी सांगितले की, पवन जल्लादला तिहार जेलच्या मजबूत आणि अतिशय सुरक्षित जेल व्हॅनमधून आणण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 सशस्त्र पोलीस जातील.
ऐनवेळी बदलू शकतो रस्ता
पवनला दिल्लीला कोणत्या रस्त्याने आणले जाईल, हे ठरले असले तरी ऐनवेळी त्याचा रस्ता बदलण्याची शक्यता आहे. पवन जल्लादला आणण्यासाठी दिल्ली पोलीस तिसरी वाहिनीसह तामिळनाडु स्पेशल पोलीस फोर्सच्या जवानांनाही पाठवले जाऊ शकते.
पोलीसांना पूर्ण जबाबदारी नाही
दिल्ली पोलीस थर्ड बटालियनचे काही जवान एका कुख्यात गुन्हेगाराला मागच्या वर्षी लखनऊच्या एका हॉटेलमध्ये मौजमस्ती करत बिर्याणी खाऊ घालताना सापडले होते. यामुळे पोलिसांवर कमीतकमी निर्भयाच्या दोषींना फाशी देणार्या जल्लादला आणण्याची पूर्ण जबाबदारी देणे धोकादायक ठरू शकते, म्हणून काळजी घेतली जात आहे.
Visit : bahujannama.com