यामध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर, मेघा पानसरे यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी डाॅ. एन. डी. पाटील यांनी सर्वांना शपथ दिली. कर्नाटक एसआयटीने तपास गतीने केला. त्यांच्या तपासामुळे दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येतील महत्त्वाचे धागेदोरे हाती आले. तसा तपास महाराष्ट्र एसआयटीने करावा, पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येचा तपास निर्णायक टप्प्यावर आला आहे. तपास यंत्रणांनी अधिक गतीने तपास करून विवेकवाद यांची हत्या करण्याचा विचार मांडणाऱ्यांच्या मुळाशी गेले पाहिजेअसे मत यावेळी मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केले.
धर्मांध शक्तींना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. विवेक अभिव्यक्ति स्वातंत्र्य देखील आवश्यक आहेत. ज्यांना गजाआड घालायचे ते मोकाट फिरत आहेत. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा असे डाॅ. एन. डी. पाटील म्हणाले.
दुपारी ४ वाजता शाहू स्मारक येथे स्मृती जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध लेखक, सिनेगीतकार, माजी खासदार जावेद अख्तर यांचे ‘२१ व्या शतकातील अंधार युग’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. जागर सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आ. ह. साळुंखे यांची प्रमूख उपस्थिती असणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन संघर्ष समितीने केले आहे.
यामध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर, मेघा पानसरे यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी डाॅ. एन. डी. पाटील यांनी सर्वांना शपथ दिली. कर्नाटक एसआयटीने तपास गतीने केला. त्यांच्या तपासामुळे दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येतील महत्त्वाचे धागेदोरे हाती आले. तसा तपास महाराष्ट्र एसआयटीने करावा, पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येचा तपास निर्णायक टप्प्यावर आला आहे. तपास यंत्रणांनी अधिक गतीने तपास करून विवेकवाद यांची हत्या करण्याचा विचार मांडणाऱ्यांच्या मुळाशी गेले पाहिजेअसे मत यावेळी मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केले.
धर्मांध शक्तींना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. विवेक अभिव्यक्ति स्वातंत्र्य देखील आवश्यक आहेत. ज्यांना गजाआड घालायचे ते मोकाट फिरत आहेत. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा असे डाॅ. एन. डी. पाटील म्हणाले.
दुपारी ४ वाजता शाहू स्मारक येथे स्मृती जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध लेखक, सिनेगीतकार, माजी खासदार जावेद अख्तर यांचे ‘२१ व्या शतकातील अंधार युग’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. जागर सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आ. ह. साळुंखे यांची प्रमूख उपस्थिती असणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन संघर्ष समितीने केले आहे.