1. ’तू जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं’ : –
तुम्ही कितीही नाराज झालात किंवा संतापलात तरी मुलांना चुकूनही बोलू नका की, ’तू जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं’. कोणत्याही मुलाला आपल्या पालकांकडून हे ऐकायचे नसते. असे बोलण्याने मुलांच्या भावना दुखावतात, शिवाय त्यांचा आत्मसन्मान सुद्धा दुखावतो. यामुळे मुलाच्या मनात ही शंका येऊ शकते की, तो कुणालाच आवडत नाही.
2. ’लवकर आटप, नाहीतर मी तुला इथंच सोडून जाईन’ –
कुठे जायचे असेल आणि तुम्हाला उशीर होत असेल तर मुलाला कधीही असे म्हणू नका की लवकर आटप नाहीतर मी तुला इथंच सोडून निघून जाईन. मुलांना वेळेच्या किंमतीचा अंदाज मोठ्यांप्रमाणे नसतो. अशा बोलण्याने त्यांच्या मनात हरवण्याची किंवा सोडून जाण्याची भीती निर्माण होते. उशीर होत असेल तर लवकर आटपण्यासाठी वेगळ्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
3. ’तुला जे आम्ही सांगतो ते कधीही करत नाहीस’ –
जर तुम्ही मुलाला वारंवार असे बोललात तर त्याच्या मनात ही भावना येईल की, तो काहीही योग्यप्रकारे करत नाही. त्याऐवजी असे म्हणा की, मला वाटतं की तू हे काम यापद्धतीने कर. तुम्हाला जे हवे आहे ते मुलाला स्पष्टपणे सांगा आणि चुकीचे असले तरी प्रेमाने सांगा की, ते कशाप्रकारे करायचे होते.
4. ’तू तुझ्या भाऊ/बहिणीसारखा असतास तर’ –
दुसर्यांसोबत तुलना कुणालाही पसंत नसते. मुलांना आपले केलेले कौतूक जास्त पसंत असते. अशाप्रकारचे बोलणे मुलाच्या मनात आपला भाऊ/बहिणीसाठी द्वेषाची, स्पर्धेची भावना वाढवते. मुलांच्या सुद्धा मनात ही गोष्ट घर करते की, तो आपला भाऊ/बहिणीसारखा चांगला कधीही होऊ शकत नाही. लक्षात ठेवा की प्रत्येक मुल वेगळे असते आणि त्याचे आपले वैशिष्ट्य असते.
5. ’आपण ते खरेदी करू शकत नाही’-
जर तुम्ही तुमच्या मुलाला हे म्हणालात की, ही वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही तर त्याला वाटेल की, पैशाने प्रत्येक आनंद खरेदी करता येऊ शकतो. त्याच्या मनात ही गोष्ट येईल की, तुम्ही एखाद्या आर्थिक तंगीमध्ये आहात, जरी तुम्ही नसाल. मुलाला नकार देण्याचे एखादे वेगळे पण योग्य कारण सांगा.
जर नकळत तुम्ही मुलाला असे काही बोललात तर ताबडतोब त्यास सॉरी बोला आणि समजवा की, तुमच्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि यापुढे तुम्ही असे बोलणार नाही. मुले पालकांकडून अपेक्षा करतात की, ते प्रत्येक कामात त्यांचे धैर्य वाढवतील.
1. ’तू जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं’ : –
तुम्ही कितीही नाराज झालात किंवा संतापलात तरी मुलांना चुकूनही बोलू नका की, ’तू जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं’. कोणत्याही मुलाला आपल्या पालकांकडून हे ऐकायचे नसते. असे बोलण्याने मुलांच्या भावना दुखावतात, शिवाय त्यांचा आत्मसन्मान सुद्धा दुखावतो. यामुळे मुलाच्या मनात ही शंका येऊ शकते की, तो कुणालाच आवडत नाही.
2. ’लवकर आटप, नाहीतर मी तुला इथंच सोडून जाईन’ –
कुठे जायचे असेल आणि तुम्हाला उशीर होत असेल तर मुलाला कधीही असे म्हणू नका की लवकर आटप नाहीतर मी तुला इथंच सोडून निघून जाईन. मुलांना वेळेच्या किंमतीचा अंदाज मोठ्यांप्रमाणे नसतो. अशा बोलण्याने त्यांच्या मनात हरवण्याची किंवा सोडून जाण्याची भीती निर्माण होते. उशीर होत असेल तर लवकर आटपण्यासाठी वेगळ्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
3. ’तुला जे आम्ही सांगतो ते कधीही करत नाहीस’ –
जर तुम्ही मुलाला वारंवार असे बोललात तर त्याच्या मनात ही भावना येईल की, तो काहीही योग्यप्रकारे करत नाही. त्याऐवजी असे म्हणा की, मला वाटतं की तू हे काम यापद्धतीने कर. तुम्हाला जे हवे आहे ते मुलाला स्पष्टपणे सांगा आणि चुकीचे असले तरी प्रेमाने सांगा की, ते कशाप्रकारे करायचे होते.
4. ’तू तुझ्या भाऊ/बहिणीसारखा असतास तर’ –
दुसर्यांसोबत तुलना कुणालाही पसंत नसते. मुलांना आपले केलेले कौतूक जास्त पसंत असते. अशाप्रकारचे बोलणे मुलाच्या मनात आपला भाऊ/बहिणीसाठी द्वेषाची, स्पर्धेची भावना वाढवते. मुलांच्या सुद्धा मनात ही गोष्ट घर करते की, तो आपला भाऊ/बहिणीसारखा चांगला कधीही होऊ शकत नाही. लक्षात ठेवा की प्रत्येक मुल वेगळे असते आणि त्याचे आपले वैशिष्ट्य असते.
5. ’आपण ते खरेदी करू शकत नाही’-
जर तुम्ही तुमच्या मुलाला हे म्हणालात की, ही वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही तर त्याला वाटेल की, पैशाने प्रत्येक आनंद खरेदी करता येऊ शकतो. त्याच्या मनात ही गोष्ट येईल की, तुम्ही एखाद्या आर्थिक तंगीमध्ये आहात, जरी तुम्ही नसाल. मुलाला नकार देण्याचे एखादे वेगळे पण योग्य कारण सांगा.
जर नकळत तुम्ही मुलाला असे काही बोललात तर ताबडतोब त्यास सॉरी बोला आणि समजवा की, तुमच्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि यापुढे तुम्ही असे बोलणार नाही. मुले पालकांकडून अपेक्षा करतात की, ते प्रत्येक कामात त्यांचे धैर्य वाढवतील.