बहुजननामा ऑनलाइन टीम – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत संपूर्ण देशात खळबळ उडाली असताना, काही लोक असेही आहे ज्यांना या कायद्यामुळे फार आनंद झाला आहे. भारतात असे लोक आहेत जे बर्याच वर्षांपूर्वी पाकिस्तानहून भारतात आले होते आणि बहुतेकांना अद्याप भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. त्याचबरोबर पंजाबमध्ये हजारो लोक आहेत जे पाकिस्तानातून आले आहेत आणि पंजाबमध्ये राहत आहेत.
पाकिस्तानहून आल्यानंतर भारतात राहणाऱ्या या लोकांनी आपला भूतकाळ सांगितला तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रु आले. एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानमध्ये केवळ भेदभावच नव्हे तर मुस्लिम नसल्यामुळे अत्याचार कसे केले जातात त्याचबरोबर महिला व मुलींना जबरदस्तीने धर्मांतर केले जाते आणि त्यांचा छळही केला जातो. हे सांगितले.
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या या लोकांनी त्यांची शोकांतिका सांगितली तेव्हा त्यांचे डोळेही भरून आले. या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना मरण पसंत आहे मात्र पाकिस्तानमध्ये परत जाणे पसंत नाही. लोक म्हणतात की, पाकिस्तानी असल्याने त्यांना चांगली नोकरी मिळत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही. म्हणून कोणी भाजीपालाचा व्यवसाय करतात किंवा मग मजुर म्हणून काम करतात आणि असेच आपले जीवन जगतात.
55 वर्षांच्या दर्शना पाकिस्तानमधून आल्या आहे. त्यांना भाड्याने घर मिळाले आहे. त्या तिथेच राहतात. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना पाकिस्तानला जाणे पसंत नाही. इम्रान खान यांच्या पक्षाच्या पीटीआयचे आमदार असलेले बलदेव सिंग हे पंजाबमधील खन्ना येथेही राहत आहेत. कुटुंबासह एका अपार्टमेंटमध्ये ते राहतात. ते कपड्यांच्या दुकानात मजुरी करतात. बलदेव यांनी भारत सरकारकडे राजकीय आश्रय मागितला असला तरी आता कायदा आल्यानंतर भारताचे नागरिकत्व मिळण्याची आशा त्यांची आहे. दरम्यान, पाकिस्तानातून येऊन कॅम्पमध्ये राहत असलेल्या लोकांनी मोदी आणि अमित शहा यांच्या घोषणा दिल्या आणि भारत सरकारचे आभार मानले.