बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यानंतर जगभरातील दिग्गजांकडून आणि देशातील पंतप्रधानांपासून ते गाव-खेड्यातल्या सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण अजिंक्य भारताच्या विराट कामगिरीची कौतुक करत आहेत. यात पाकिस्तानचा आक्रमक खेळाडू वसीम अक्रम आणि ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग यांनीही कौतुक केले आहे. वसीमने भारतीय संघाचं तोंड भरुन कौतुक करताना म्हटले आहे की, ‘वा इंडिया वा… अजिंक्य भारताचा अविश्वसनीय कसोटी सामना आणि मालिका विजय पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आजपर्यंत कुठल्याच आशियाई क्रिकेट संघात भारतीय संघासारखा हा धाडसी बाणा आणि धैर्यवान लढा दिसून आला नाही. फ्रंटलाईन खेळाडू जखमी झाले, तरी कुठलाच अडथळा भारतीय संघाला विजयापासून रोखू शकला नाही. विशेष म्हणजे 36 धावांवर ऑल आऊट झाल्यानंतरही दुसऱ्या सामन्यातील हा विजय इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे वसीमने म्हटले आहे.
भारताच्या युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जो खेळ केला, तो पाहून सर्वच अवाक् आहेत. गॅबावरील अविश्वसनीय विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे बरेच आजी-माजी खेळाडू सदनात गेले आहेत. एडलेडवरील पराभवानंतर अनेकांनी ऑस्ट्रेलिया ही मालिका 4-0 अशा फरकाने जिंकेल असा दावा केला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडिया दुबळी झालीय, असेही अनेकांचे म्हणणे होते. पण, गॅबा कसोटीनंतर ती सर्व मंडळी तोंडावर पडली. यात ऑस्ट्रेलियाचा पाँटिंग आणि पाकिस्तानचा वसीम अक्रम यांचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाने ठेवलेले 328 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं 3 विकेट्स राखून पार केले आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता आणि रिषभ पंतने धमाकेदार खेळी करून त्यावर कळस चढवला. टीम इंडियाच्या या विजयानं अनेकांना धक्के दिले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँ पाँटिंगनेही हा पराभव मान्य केला आणि टीम इंडियाच या विजयाची खरी हकदार होती, असे सांगितले.