बहुजनानामा ऑनलाईन- पाकिस्तान कश्मीर मुद्द्यावर तृतीय पक्षाच्या मध्यस्थीसाठी तयार आहे आणि या खटल्याची वैधता आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित आहे. असे वक्तव्य पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी गुरुवारी (ता.११) साप्ताहिक पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान-इम्रान खान शुक्रवारी (ता.१२) पाकिस्तान-व्याप्त काश्मीरची राजधानी (पीओके) मुजफ्फराबाद येथे जाहीर भाषणादरम्यान कश्मीर विषयी धोरणात्मक विधान करतील असे जाहीर केले.
फैजल म्हणाले की, भारत, कश्मीरचा प्रश्न हा भारत पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मानतो. यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भुमिका भारताला मान्य नाही. नवी दिल्लीनेही सीमेवर होणारे हल्ले आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही. असे स्पष्ट केले आहे. यावर पाकिस्तानने उत्तरादाखल कश्मीर हा संघर्ष आहे. घटनाक्रम नाही असे विधान केले आहे. याबाबत आपण काही पावले उचलली आहेत आणि भविष्यातही काही महत्वाचे निर्णय घेतले जातील.
दरम्यान तीन दिवसांच्या जिनिव्हा दौर्यावरून परतल्यानंतर इस्लामाबाद विमानतळावर परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आपले मत स्पष्ट केले. ते म्हणाले की, पाकिस्तान प्रत्येक व्यासपीठावर काश्मिरी जनतेसाठी आवाज उठवत राहील.जिनिव्हा येथील यूएनएचआरसीला काश्मीरमधील मानवी हक्कांच्या परिस्थितीविषयी माहिती दिली आहे. काश्मीरमधील लोक त्यांच्या हक्कांच्या लढ्यात एकटे नाहीत. पाकिस्तान त्यांना नैतिक, राजकीय आणि मुत्सद्दी समर्थन पुरवत राहील.