नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारतविरोधी मोहीम सुरु केली असून दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर इम्रान यांनी एक आवाहन केले आहे. त्यांनी इस्लामिक देशांना भारतविरोधी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच इराणणेही भारताचा निषेध केला असताना आता इम्रान यांच्याकडून इतर देशांना भारताविरोधात बोलण्याचे आवाहन केले जात आहे.
दिल्ली हिंसाचार आणि भारतातील मुस्लिम आणि काश्मिरी जनतेवर शोषण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे इम्रान यांनी इराण आणि तुर्कीच्या राष्ट्र प्रमुखांचे आभार मानले आहेत. तसेच जगातील इतर मुस्लिम राष्ट्रांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून याबाबतही इम्रान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
I want to thank Supreme Leader Khamenei, & President Erdogan, for speaking against the oppression & massacre of Muslims in India & Kashmiris in IOJK by the Hindu Supremacist Modi regime. https://t.co/sUeIJ81q58
— Imran Khan (@ImranKhanPTI) March 5, 2020
आपल्या ट्विटरद्वारे इम्रान यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लिम जगतातून भारतातील हिंसाचाराविरोधात फार कमीजणांनी आपला निषेध नोंदवला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदू वर्चस्ववादी सरकारविरोधात पाश्चिमात्य देशांनी आवाज उठवला, असे इम्रान यांनी म्हटले. तर इराणचे सर्वोच्च नेते खमनेई यांनीही भारताविरोधात टीका केली असून त्याबाबत इम्रान यांनी ट्विट केले आहे. तसेच भारतातील मुस्लिमांविरोधात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत इराणने केंद्र सरकारवर टीका केली होती.