नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये राजकीय नेत्यांनी भारताविरोधी विधान केले असून कोर्टाकडूनही आता शेरेबाजी होऊ लागली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायधीश अतहर मिनल्लाह यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताला कमी लेखले आहे.
तिथल्या हायकोर्टात पश्तून तहफूज आंदोलन आणि अवामी वर्कर्स पार्टी या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जामिनावर सुनावणी करत होते. या कार्यकर्त्यांना पीएटीएम पक्षाचे प्रमुख मंजूर पश्तीन यांना अटक केल्याविरोधातील आंदोलनात अटक केले होते. त्यांच्यावर देशद्रोही आणि दहशतवादी कलमांतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले होते.
इस्लामाबाद हायकोर्टात याच प्रकरणाची सुनावणी चालू असताना कोर्टाने पोलिसांची कानउघाडणी केली आहे. लोकशाहीत निवडून आलेल्या सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी अपेक्षित नसून सरकारने इथे सर्वांच्या संविधानिक अधिकाराचे रक्षण केले जाईल. कारण हा देश भारत नसून पाकिस्तान आहे, असे न्यायाधीशांनी म्हटले होते. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवरचे गुन्हे लगे घेतले असल्याचे कोर्टात सांगितले आणि कोर्टाच्या आदेशामुळे हे प्रकरण संपुष्टात आले आहे.
तसेच भारताविरोधी पाकिस्तानमधील कोर्टात शेरेबाजी झाली असताना भारताने अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मागच्या काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्कवाढी विरोधात आंदोलन केले असताना काही विद्यार्थी नेत्यांना अटक केले होते.