इस्लामाबाद : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, अलीकडेच एका शीख मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले होते, त्यात आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. त्यामुळे मानवाधिकाराच्या उल्लंघनाबद्दल भारताला शहाणपणा शिकवणाऱ्या पाकिस्तानला आपल्या घराकडे पाहण्याची गरज आहे पाकिस्तानच्या सिंधमध्ये आता एका हिंदू मुलीचे अपहरण करून जबरदस्तीने तिचे लग्न मुस्लिम माणसाशी करून दिले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या एका आठवड्यात अशी ही दुसरी घटना उघडकीस आली आहे.
हे प्रकरण पाकिस्तानच्या सिंध भागातील आहे, जेथे बीबीएमध्ये शिकणार्या एका हिंदू मुलीचे २९ ऑगस्ट रोजी अपहरण केले गेले होते. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार तिच्याच वर्गात शिकणाऱ्या बाबर अमन आणि सात्याचा थीदार मिर्झा दिलावर बेग यांनी पळवून नेले होते. मिर्झा दिलावर बेग हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तहरीक-ए-इंसाफ पक्षाचा सदस्य आहे. असा आरोप केला जात आहे की मुलगी सियालकोटमध्ये असलेल्या पीटीआय कार्यकर्त्याच्या घरी नेण्यात आली आहे. तेथे तिचे जबरदस्तीने इस्लाम धर्मांतर झाले आणि तिचे लग्न बाबर अमनशी करण्यात आले.
त्यामुळे दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी बाबर अमनच्या भावाला अटक केली आहे, परंतु या पीडित मुलगी आणि बाबर अमनबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानमध्येच अखिल पाकिस्तान हिंदू पंचायतीने या घटनेचा निषेध केला असून हिंदू मुलींसोबत अशा प्रकारची घटना घडत असल्याबद्दल सतत चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या नानकाना साहिबमधून १९ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते आणि तिचे धर्मांतर केले गेले होते, यामुळे बरीच खळबळ उडाली होती. भारतातही या विषयावर बरेच वाद झाले होते, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी परराष्ट्रमंत्र्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या