बहुजननामा ऑनलाईन- दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तान( pakistan)च्या कुरापती अजूनही थांबलेल्या नाहीत. भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाक सतत करत आहे. मात्र, सीमेवर तैनात भारतीय जवान त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देत नाहीत. लष्कराच्या सूत्रांनी न्यूज एजन्सीला सांगितले की, जवानांना किशन गंगा नदीच्या किनार्यावर घुसखोरांची हालचाल दिसली. ताबडतोब, जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह संयुक्त अभियान सुरू करण्यात आले.
https://twitter.com/ANI/
त्यांनी सांगितले की, नदीच्या दुसर्या किनार्यावरून रश्शीने बांधलेल्या ट्यूबमधून काही वस्तू घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना 2-3 दहशतवादी आढळले. जवानांनी तेथे पोहचून शस्त्र जप्त केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये काल तैनात भारतीय लष्कराने पीओजेकेवरून शस्त्रांच्या तस्करीसाठी पाकिस्तानी लष्कराद्वारे समर्थित दहशतवाद्यांचा एक प्रयत्न उधळला. या दरम्यान, चार एके 74 रायफल, आठ मॅगझीन, 240 एके रायफल जप्त करण्यात आल्या.
लेफ्टनन्ट जनरल बी. एस. राजू (जीओसी चिनार कोअर) यांनी सांगितले की, या वर्षी आम्ही घुसखोरी अयशस्वी करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो. मागच्या वर्षी घुसखोरीचा आकडा 130 च्या आसपास होता, यावर्षी तो 30 पेक्षा कमी आहे. यामुळे अंतर्गत स्थिती सुधारण्यास मदत होईल.
त्यांनी पुढे म्हटले की, आमच्या सतर्क जवानांनी देखरेखीच्या उपकरणांचा वापर करत, पाकिस्तानद्वारे तस्करी करण्यात येत असलेली शस्त्रे पडकली. यावरून समजते की, पाकिस्तानचा हेतू पहिल्यासारखाच आहे. आम्ही भविष्यातही त्यांच्या वाईट हेतूंविरोधात लढत राहू.