इस्लामाबाद : वृत्तसंस्था – एकिकडे जगातील सर्व देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंमुळे सगळीकडे हाहाकार माजला आहे. तर दुसुरीकडे पाकिस्ताने दहशतवादी संघटांना एक अनपेक्षित भेट दिली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने एफएटीएफ कारवाईच्या भीतीने तुरुंगात डांबलेल्या अतेरिकी संघटनेच्या दशतवाद्यांना कोरोनाचा धोका असल्याचे सांगून सोडून दिले आहे. एफएटीएफने ज्या दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकले होते अशा दहशतवाद्यांना पाकिस्तानने तुरुंगात टाकले होते.
एका रिपोर्टनुसार, लष्कर प्रमुख हाफिज सईदसह हे दशतवादी आपल्या घरांमध्ये रहात असून ते दहशतवादी हल्ल्याचा कट रचत आहे. गेल्या महिन्यात पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हटले होते केी, लाहोर तुरुंगातील सुमारे 50 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. याच परिस्थितीचा फायदा पाकिस्तानने अँटिबायोटीक औषधासारखा केला असून तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांना सोडले आहे. सध्या जगभरात कोरोनाचे संकट असून अशा परिस्थितीत पाकिस्तान दहशतवाद्यांना आवर घालण्या ऐवजी त्यांना सोडून देत आहे. आता एफएटीएफ पाकिस्तानविरोधात कोणती भूमिका घेते हे पहावे लागणार आहे. हे देखील पाहिले पाहिजे की, ज्यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष कोरोनावर केंद्रीत असताना पाकिस्तानने त्याचा फायदा घेऊन दहशतवाद्यांना सोडून दिले आहे.
जम्मू – काश्मीरमध्ये सध्या दहशतवादी घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी सध्या भारतातील राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करत आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याच्या उद्देशाने सीमेवर गोळीबार करत आहेत. या सर्व मुद्यांवरून असे दिसून येते की, साथीच्या रोगाविरुद्ध लढण्या ऐवजी पाकिस्तानचे लक्ष भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यावर अधिक आहे. कालच पाकिस्ताने युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होते.
वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, जम्मू – काश्मीरमध्ये 18 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरफीएफचे तीन जवान शहीद झाले होते. गेल्या एका आठवड्यात भारतीय सुरक्षा दलांवर झालेल्या तीन हल्ल्यांच्या घटनांमधून हे सिद्ध झाले आहे की, पाकिस्तान महामारीच्या संकटात देखील आपल्या नापाक कारवाया करत आहे. नुकतेच लष्कर प्रमुख मनोज मुंकद नरवणे यांनी म्हटले होते की, एककीकडे भारत जगातील देशांना मदत करण्यासाठी डॉक्टर आणि औषधं पाठवत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान दहशतवाद्यांच्या निर्यातीत गुंतला आहे.
एनपी न्यूज24 नेटवर्क