मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणाची तीव्रता वाढत असल्याचं दिसत आहे. दिवाळीनंतर हे प्रमाण अधिकच वाढलं आहे. पंजाब, हरियाणातील शेतकरी तण जाळत असल्याने दिल्लीतील हवा प्रदूषित झाली आहे. दिल्लीकरांचा श्वास कोंडला जात आहे तर दृश्यमानता कमी झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही राज्यातील सरकारची कानउघडणी केली आहे. असे असतानाच एका भाजप नेत्यानं मात्र दिल्लीतील प्रदूषणासाठी पाकिस्तान आणि चीनला जबाबदार धरलं आहे.
दिल्लीतील प्रदूषणावर भाष्य करताना भाजप नेते विनीत अग्रवाल यांनी म्हटलं आहे की, “आपल्या देशाला घाबरणाऱ्या शेजारील देशानं विषारी वायू सोडला असेल. त्यामुळे हवा प्रदूषित झाली असावी. पाकिस्तान आणि चीन आपल्याला घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी विषारी वायू सोडला असेल.” अग्रवाल यांनी याआधीही अशी विधानं केली आहेत. भाजपच्या व्यापार विभागाचे ते संयोजक आहेत.
#WATCH Meerut: BJP leader Vineet Agarwal Sharda speaks on pollution issue. Says "…Ye jo zehreeli hawa aa rahi hai, zehreeli gas aayi hai ho sakta hai kisi bagal ke mulk ne chhodi ho jo humse ghabraya hua hai. Mujhe lagta hai Pakistan ya China humse ghabraye huye hain…" (5.11) pic.twitter.com/Ajnw5d7jXU
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 5, 2019
पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले की, “पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. तो देश कटोरा घेऊन भीक मागत फिरत आहे. भारताचं नुकसान व्हावं यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी आधीही तण जाळायचे. उद्योगधंदेही आधीपासूनच सुरू आहेत. तेव्हा कधीही धुरक्याची चादर दिसली नाही. त्यामुळे प्रदूषणासाठी शेतकरी आणि उद्योगधंदे चालवणाऱ्यांना जबाबदार धरणं चुकीचं आहे. देशाच्या विकासात शेतकरी आणि उद्योगपतीचं मोठं योगदान आहे. हे दोन्हीही घटक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.”