नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी जर सैन्याला संसदेकडून आदेश मिळाला तर ते पाकिस्तान व्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ शकतात,अशी माहिती त्यांनी शनिवारी दिली. तसेच या विधानाला पाकिस्तानसाठी एक कडक संदेश असून लष्करप्रमुखांच्या या विधानानंतर पाकिस्तानला चांगलाच धक्का बसल्याचे दिसून येत आहे. तसेच पाकिस्तानने भारताला धक्का देण्याचाही प्रयत्न केला आहे.
Statements by Indian COAS to undertake military action across LOC are routine rhetoric for domestic audiences to get out of ongoing internal turmoil.
Pakistan Armed Forces are fully prepared to respond to any act of Indian aggression.— DG ISPR (@OfficialDGISPR) January 11, 2020
पाकिस्तान सैन्याच्या प्रवक्त्याने आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतीय लष्करप्रमुखांचे हे विधान देशाच्या परिस्थितीकडून दुसरीकडे वळवण्यासाठी केले आहे, असे म्हटले आहे. त्याचवेळी पाकिस्तानकडून असेही म्हटले गेले की, पाकिस्तानी सशस्त्र सेने भारताने केलेल्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी तयार आहे.
लष्करप्रमुख नरवणे यांनी “जिथपर्यंत पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न आहे. पण अनेक वर्षांपूर्वी संसदेमधून एक प्रस्ताव मंजूर झाला होता ज्यामध्ये पूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे. जर संसदेला पूर्ण क्षेत्र आमच्या ताब्यात यावे असे वाटत असेल तर त्यासंदर्भात आम्हाला काही आदेश मिळतील आणि त्यानुसार आम्ही कारवाई करू.” असे एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सांगितले.
पीओकेला ताब्यात घेण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे काही महत्वपूर्ण अधिकाऱ्यांनी भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेतल्यानंतर आणि राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागल्यानंतर म्हटले आहे. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानसोबत चर्चा करायची असेल तर ती केवळ पीओके बद्दलच झाली पाहिजे, असे म्हटले आहे.