नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील कोरोना (corona)चा वेग हळुहळु कमजोर होऊ लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात शनिवारी 1,73,790 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली. हा भारतात मागील 45 दिवसात आलेला सर्वात कमी आकडा आहे आणि या महिन्यात देशात तिसर्यांदा 200,000 पेक्षा कमी प्रकरणे नोंदली गेली आहेत.
मागील 24 तासात कोरोना व्हायरसच्या आजारामुळे किमान 3,617 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आजपर्यत एकुण 322,512 लोकांनी व्हायरसमुळे जीव गमावला आहे.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, कोरोना व्हायरसच्या 1.73 लाख नव्या प्रकरणांसह देशात कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकरणांत घसरण सुरू आहे. मागील 45 दिवसात आज कोरोना व्हायरसची सर्वात कमी नवीन प्रकरणे आली आहेत. मागील 24 तासात 2,84,601 रुग्ण कोरोनामधून बरे झाले. मागील 24 तासात सक्रिय प्रकरणांमध्ये 1,14,428 ची घट होऊन सक्रिय केसलोड 22,28,724 पर्यंत पोहचला आहे.
मागील 24 तासादरम्यान 2,84,601 रूग्ण बरे होण्यासह, देशभरात आतापर्यंत एकूण 2,51,78,011 लोक बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट वाढून 90.80 टक्के झाला आहे. साप्ताहिक सकारात्मकता दर सध्या 9.84%, वरून घसरून 8.36% झाला आहे. लागोपाठ 5 दिवसात 10% पेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर येत आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) जारी आकड्यांनुसार, भारतात काल कोरोना व्हायरससाठी 20,80,048 सम्पल टेस्ट करण्यात आली, कालपर्यंत एकुण 34,11,19,909 सॅम्पल टेस्ट केली गेली आहेत.