बहुजननामा ऑनलाइन : काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेला पाकिस्तानने विरोध दर्शविला आहे. पाकिस्तानी संसदेत सिनेटर रहमान मलिक म्हणाले कि, ‘ कलम ३७० विरुद्ध आवाज उठवल्याने पी. चिदंबरम याना अटक करण्यात आली. काश्मीरमधील परिस्थितीकडील लक्ष वळविण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) खुली सूट दिली आहे.’
येत्या काही दिवसांत विरोधी पक्ष नेत्यांकडून आणखी अटक केली जाईल, जेणेकरून सर्व विरोधी आवाज दडपता येतील, अशी भीती सिनेटकाला वाटत आहे. रहमान मलिक म्हणाले की, चिदंबरम इस्लामाबादमधील सार्क परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात आले असता, त्यांनी मला सांगितले होते की हिंदु कट्टरपंथीयांचे नवीन ब्रिगेड भारतात उभे राहणार आहे. परंतु त्यावेळी मी त्यांच्या मताशी सहमत नव्हतो, पण नंतर चिदंबरम बरोबर होते हे मान्य करावे लागेल.
रहमान मलिक म्हणाले की पंतप्रधान मोदी केवळ काश्मिरींची हत्या करत नाहीत तर त्यांच्या अतिरेकी विचारसरणीला विरोध करणाऱ्या राजकारण्यांनाही लक्ष्य करीत आहेत. मलिक यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मानवी हक्क संघटनांना निष्पाप काश्मिरींवरील अत्याचाराची दखल घेण्याचे आवाहन केले.