नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे पुढील सहा महिन्यात गरीबीचे संकट ओढवणार असून जगभरातील अंदाजे 12 कोटी मुलांवर परिणाम होणार आहे. भारताबरोबरच दक्षिण आशियामधील देशांमध्ये राहणार्या लहानमुलांसंदर्भात बालकल्याण आणि मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणार्या युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने चिंता व्यक्त केली आहे. युनिसेफने जारी केलेल्या अहवालामध्ये जॉन्स हॉपकिन्स ब्लुमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या एका अभ्यासाचा संदर्भ देण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 5 वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या 8 लाख 80 हजार मुलांचा आणि 36 हजार मातांचा मृत्यू होण्याची शक्यता युनिसेफने व्यक्त केली आहे. ‘लाइव्स अपेडेंड हाऊ कोवीड-19 थ्रेट्स द फ्यूचर्स ऑफ 600 मिलियन साऊथ एशियन चिल्ड्रन’ या नावाने प्रकाशतील करण्यात आलेल्या अहवालामध्ये दक्षिण आशियामधील परिस्थिती संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूटान, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका या देशांमधील परिस्थितीबद्दल या अहवालात भाष्य करण्यात आले आहे. दक्षिण आशियामधील 24 कोटी मुले आधीच गरीबीच्या समस्येला तोंड देत आहेत. यामध्ये आरोग्यव्यवस्थेची कमतरता, शिक्षण घेताना येणारे अडथळे, अस्वच्छता तसेच एकंदरित जीवनाचे खालावलेली गुणवत्ता अशा समस्यांचा समावेश आहे.
या असा संकाटांचा समाना करणार्या मुलांच्या संख्येत कोरोना संकटामुळे वाढ होणार असून आणखीन 12 कोटी मुलांना गरीबीमुळे उद्भवणार्या या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे असे अहवालात म्हटले आहे. कोरोनामुळे या प्रदेशामधील मुलांना मिळाणारे पोषक अन्न, लसीकरण आणि इतर महत्वपूर्ण आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सर्वात वाईट परिस्थितीमध्ये दक्षिण आशियामध्ये पुढील वर्षभराच्या कालावधीमध्ये पाच वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या 8 लाख 80 हजार मुलांचा तसेच 36 हजार महिलांचा म्हणजेच आयांचा मृत्यू होऊ शकतो. यापैकी सर्वाधिक मृत्यू हे भारत आणि पाकिस्तानमध्ये होतील. बांगलादेश आणि अफगाणिस्तानममध्ये मृत्यूदर अधिक असणाार आहे.