मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस उलगडले आहेत, तरी अजूनही राज्यात स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीला बहुमत मिळूनही भाजप -शिवसेनेत सत्तावाटपावरुन वाद सुरु आहेत. त्यामुळे इतर पक्षांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. कदाचित कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा यंत्रणेवर सहमत नसतील. मात्र ‘महाराष्ट्रातील सद्यस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकच मार्ग आहे. इतर पक्षांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला समर्थन देत सरकार स्थापनेत पाठिंबा द्यावा, असेही पाटील म्हणाले.
याबाबत पाटील पुढे म्हणाले कि, ‘जर अश्या व्यवस्थेवर दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली तर, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार स्थापन करू शकते. ‘ पाटील यांनी इतर पक्षांना पाठिंबा देण्याचे सांगितले असले तरी त्यांचा हा इशारा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेला असू शकतो.
त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितले की, ‘राष्ट्रपती राजवटीकडे महाराष्ट्र्राची वाटचाल सुरु आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर एका महिन्यात सर्व गोष्टी सामान्य होतील. सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्याला माघार घ्यावीच लागेल.’ तसेच राष्ट्रवादी ‘वेट अँड वॉच’ ही भूमिका आजमवणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
Visit : bahujannama.com