नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला. सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये नाराजी असून सर्वत्र विरोध केला जात आहे. नागपुरातही या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. दोन दिवसांचे म्हणत सात दिवसांचे लॉकडाऊन लादण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी असून याचा रोष वाढत चालला आहे. ही जनतेची फसवणूक असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लॉकडाऊनमुळे गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल
राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. हे चांगले नसल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, लॉकडाऊनमुळे सुरळीत झालेले व्यवसाय पुन्हा मागे जाणार आहेत. यामुळे गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढत चालला आहे. राज्य सरकारने व्यापाऱ्यांचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे, समाज आणि सरकार हे एकमेकांसमोर उभे राहणे चांगले नसल्याचे फडणवीस म्हणाले.
Allegations in #SachinWaze letter are very serious. We demand in-depth probe in this.Truth must come out!
MVA Govt should stop politics & blaming GoI over vaccines.
Instead, MVA must focus on stopping black marketing of Remdesivir!
My interaction at Nagpur https://t.co/GmygmmYEiP pic.twitter.com/macV83aADD— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2021
यामुळे नागरिकांचा उद्रेक
राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेतला त्यावेळी स्टेट होल्डर सोबत चर्चा करायला हवी होती. यामधून त्यांचे समाधान कसे करता येईल आणि कठोर निर्बंध लागू करता येतील याचा विचार करायला पाहिजे होता. मात्र, तसे न झाल्याने नागरिकांचा उद्रेक वाढत चालला आहे, असे फडणवीस म्हणाले.
तर दुसऱ्या राज्यातून रेमडेसीवीर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रेमडेसीवीर इजेक्शन मिळत नाही काही ठिकाणी काळाबाजार होत आहे, या संदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले, रेमडेसीवीरचा काळाबाजार काही लोक करीत आहेत. आताही हा प्रकार पहाला मिळत आहे. दुसरी लाट ही काही राज्यांमध्येच आहे. मागची लाट ही सर्वच राज्यांमध्ये होती. त्यामुळे आता आपल्या राज्याने दुसऱ्या राज्यातून रेमडेसीवीर घेता येईल का ? याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ज्या राज्यात लाट नाही तिथून रेमडेसवीर घ्यावे. कंपन्यांशी संपर्क साधून पुरवठ्यावर भर दिला पाहिजे. उत्तर प्रदेशपेक्षा जास्त लस महाराष्ट्राला मिळाल्या असल्याचे सांगत लसीवर सुरु असलेले राजकारण थांबवावे, असे फडणवीस यांनी म्हटले.
सत्य बाहेर येणे गरजेचे
सचिन वाझे यांच्या पत्रात दोन कोटी आणि 50 कोटींचा उल्लेख आहे, हे गंभीर प्रकरण आहे. पत्र अत्यंत गंभीर असून माध्यमातून पत्र पाहिले. ही बाब महाराष्ट्रात जे घडतेय ते महाराष्ट्र व पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही. उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीसाठी सांगितले आहे. आता दूध का दूध व पाणी का पाणी व्हायला पाहिजे. सत्य बाहेर येणे गरजचे आहे. अन्यथा प्रतिमा सुधारणार नाही, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.