नवी दिल्ली: वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरगोस मतानंतर मोदी सरकारचा शपथविधी पार पडला शपथविधीनंतर पंतप्रधान मोदी सरकारची दुसरी इनिंग सुरू झाली आहे.त्यापार्श्वभूमीवर योगगुरु रामदेव बाबा यांनी मोदी सरकारला शुभेच्छा देत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रामदेव बाबा यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद मोदी यांना अभिनंदन केले आहे तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतीक आव्हानांचा सामना करण्यास मदत मिळेल. तर विरोधकांना १० ते १५ वर्ष कपालभाती करण्याचा सल्ला दिला आहे.
या आधी रामदेव बाबा यांनी येणाऱ्या काळात भारतासमोरील आव्हानांसाठी देशाची वाढती लोकसंख्या जबाबदार आहे. या मुद्द्यावर नियंत्रण आणण्यासाठी लोकसंख्या नितीवर कायदा आणायला हवा असे म्हंटले होते . लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे विरोधी पक्षनेते तणावातून जात आहेत. १०-१५ वर्षापर्यंत तणावाला दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी कपालभाती करायला हवे. असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.