बहुजननामा ऑनलाइन टीम – बिहारमधील विधानसभा निवडणुकीने देशातील भाजप कार्यकर्त्यात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे. मोदीक्रेझ आजींची कायम असल्याचेच बिहार निकाल दर्शवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपला लागलेली गळतीलाही ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच बरोबर आता पुन्हा एकदा राज्यात ‘ऑपरेशन लोट्स’*(Operation Lotus) ची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान बिहार व पोटनिवडणुकीतील निकालाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, असे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आणखी काही भाजप नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागतील, असा दावा केला जात होता. पण बिहारह अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपला मिळाले यश पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अजूनही कमी झालेली दिसत नाही. त्यामुळे कोणी भाजप सोेडून जाणे राजकीय शहाणपणाचे होईल का याचा विचार कुंपणावरील नेते नक्कीच करतील, असे म्हटले जाते.
दरम्यान भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की बिहारच्या निकालाने भाजप सोडण्यास कोणी धजावेल, असे वाटत नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी होते. ते सातत्याने तेथील प्रचार रणनीती ठरविण्यात महत्त्वाची भूमिका वठवत होते. बिहारमध्ये भाजपने यश मिळविल्याने फडणवीस यांची पक्षातील उंची वाढेल, असे त्यांनी सांगितले.
बिहारमधील निवडणूक यशानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोट्स’(Operation Lotus) होणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र भाजप सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत राहील, असे सांगितले. ‘ऑपरेशन लोट्स’ पेक्षा सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षतील गळती रोखण्याचे आव्हान आहे. या निकांलामुळे ते कमी होईल, यात शंका नाही, त्यानंतरची काय परिस्थिती असेल त्यावर ‘ऑपरेशन लोट्स’ सुरु होईल अशीही चर्चा सुरु आहे.