नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – भाजपने सतेत येण्यापूर्वी येथील आदिवासी समाजाला दिलेले आश्वशन पूर्ण केले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असता राज्य सरकार दिलेले आश्वशन पाळाले नाही.भाजप सरकारने राज्यातील धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू केल्याने आदिवासी समाजात नाराजी पसरली आहे.त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी बुधवारी (६ मार्च ) रोजी नाशिक ते मुंबई सरकारच्या विरोधात लॉंग मार्च काढण्यात येणार आहे.
भाजपाला ४ लोकसभा व २५ विधानसभा निवडणुकीत इंगा दाखवण्याचा इशारा आदिवासी समाजाकडून दिला आहे.धनगर समाजाला खुश करण्यासाठी भाजप सरकारने टाटा समाज विज्ञान संस्थेने ( टिस ) च्या अहवालाच्या आधारे आदिवासींच्या सामाजिक व शैक्षणिक सवलती या धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय २ मार्च रोजी घेतला होता. धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्यास राज्यातील आदिवासींचा तीव्र विरोध असतानाही भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात आदिवासींमध्ये संतापाची लाट आहे.
सरकारने धनगर समाजाला लागू केलेल्या सवलती रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ६ मार्च रोजी नाशिकमधून लाँग मार्च काढला जाणार आहे. नाशिक ते मुंबई असा हा लाँग मार्च असून. तो मंत्रालयावर धडकणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा लाँग मार्च सर्वपक्षीय आहे. काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस. शिवसेनेच्या नेत्यांनाही त्यात सामील करून घेतले जाणार आहे. अशी माहिती आयोजकांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.