नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – सत्ताधारी आरक्षणाचे राजकारण करत असल्याने ओबीसी समूहातील भटके विमुक्त, विशेष मागासवर्गीय व लहान-लहान जाती समूह प्रचंड दबावात वावरत आहेत. शासन-प्रशासन आणि न्याय व्यवस्थेची भूमिका याबाबत अस्वस्थता निर्माण करीत आहे. त्यामुळे आपल्या आरक्षणाच्या संरक्षणार्थ ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी एल्गार मोर्चाचे आयोजन २५ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानात करण्यात आले आहे, अशी माहिती ओबीसीच्या मेळाव्यात देण्यात आली. तसेच या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही मान्यवरांनी केले.
मुंबईतील एल्गार मोर्चाच्या तयारीनिमित्त नांदेड येथे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या वेळी माजी आ. प्रकाशअण्णा शेंडगे व आ. हरिभाऊ राठोड यांनी हजारोंच्या संख्येत मुंबई येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ. हरिभाऊ राठोड होते. मेळाव्याचे उदघाटन माजी आ. प्रकाशअण्णा शेंडगे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बालाजी शिंदे, स्वागताध्यक्ष म्हणून प्रल्हाद गिते, नंदकुमार कोसबतवार उपस्थित होते. या वेळी सुरेंद्रकुमार जयस्वाल, अरूण खर्नाटे, बालाजी ईिबतदार, रामचंद्र येईलवाड, बालाजी खर्डे पाटील, हैदर पटेल, शोभाराणी चव्हाण, नामदेव आईलवाड, गणेश गुंडेवार, साहेबराव बेळे, गोविंद फेसाटे, व्यंकटराव पार्डीकर, गोविंदराम सुरनर, पी. पी. बंकलवाड, लक्ष्मणराव क्षीरसागर, ॲड. प्रदीप राठोड, हनुमंत सांगळे, गणपत पाचंगे, गंगाधर मावले, संग्राम निलपत्रेवार, विनोद सुत्रावे आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक एस. जी. माचनवार यांनी केले. प्रकाश राठोड यांनी सूत्रसंचालन केले.