मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री म्ह्णून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली, तसेच आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले. त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. यावरही ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलत नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले.
या दोन्ही मागण्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिए यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील दलितांवरील गुन्हेही माफ करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्रच प्रकाश गजभिए यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे.
Nationalist Congress Party MLC Prakash Gajbhiye has written to Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray 'seeking withdrawal of cases filed against dalits in the Bhima Koregaon violence' pic.twitter.com/kCw42FQhrr
— ANI (@ANI) December 3, 2019
दरम्यान, प्रकाश गजभिये हे वेशांतर करून विधान परिषदेत येणारे आमदार म्हणून प्रसिद्ध आहेत. कधी संत, कधी छत्रपती शिवाजी महाराज तर कधी गांजलेला शेतकरी अशा वेशामध्ये ते विधान परिषदेत आले आहेत.
Visit : bahujannama.com