बहुजननामा ऑनलाइन टीम – सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूपासून ज्या व्यक्तीबद्दल सतत चर्चा होत असते ती व्यक्ती म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया चक्रवर्तीने आपले बोलणे समोर ठेवले आहे. रियाने सर्व काही उघडपणे सगळ्यांसमोर ठेवले आहे, रियाने सांगितले की ज्या पद्धतीने तिला वागणूक दिली जात आहे, ज्याप्रकारे दररोज तिच्याबाबत काहीना काही कथा रचल्या जात आहेत, त्यावरून सुशांतऐवजी तिनेच आत्महत्या करायला हवी होती असे तिने सांगितले. वारंवार रिया चक्रवर्तीने म्हटले की सद्य परिस्थिती अशी बनली आहे की रोज-रोज मारण्यापेक्षा एखाद्याने मला रांगेत उभे करून गोळी घालावी. रियाच्या म्हणण्यानुसार आता तिच्या आईची प्रकृती खालावली आहे. एक-दोन दिवसानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
सुशांत सिंह राजपूत यांच्याविषयी बोलताना रिया चक्रवर्ती म्हणाली की, आता मला त्या लोकांना अपील करायची आहे की ज्या पद्धतीने जस्टिस फॉर सुशांत बाबत बोलले जात आहे. आज मलाही तशीच गरज आहे. आता जस्टिस फॉर रियाची आवश्यकता आहे. तिने असेही म्हटले आहे की मला वाटतं की सुशांत इथेच आहे. तो मला पहात आहे. कदाचित कुठेना कुठे हे देखील एक कारण आहे की तो अद्याप जिवंत आहे.
रियाने सांगितले, ती फक्त यामुळे जिवंत आहे की सुशांतचा मृत्यू कसा झाला हे तिला जाणून घ्यायचे आहे
रिया म्हणाली की ती दररोज मरत आहे. तिचे आयुष्य आता खूप वाईट झाले आहे. तिच्यासमोर कोणताही मार्ग नाही. अशा वेळीसुद्धा जर ती जिवंत असेल तर ते यामुळेच की सुशांतचा मृत्यू कसा झाला हे तिला जाणून घ्यायचे आहे. ती म्हणते की 8 तारखेला तिने घर सोडले, त्यानंतर 8 ते 13 पर्यंत मितू त्यांच्यासोबत होती. त्या पाच दिवसांत काय घडले हे तिला जाणून घ्यायचे आहे. दिशा सॅलियन बाबतीत काय घडले हे तिला जाणून घ्यायचे आहे. अखेर सुशांतने असे पाऊल का उचलले अशा अनेक प्रश्नांबाबत तिला जाणून घ्यायचे आहे.