मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. अनेकांनी त्यांची पाठराखण केली आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी आपण ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार स्वीकारणार आहे, असं सांगितलं होतं. आज दुपारी २ वाजता शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद आणि निदर्शने सुरु केली आहेत.
अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या कारवाईविरोधात पाऊल उचलं आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रया दिली आहे की, ज्या प्रकरणात शरद पवारांचे नाव नाही तरीही गुन्हा दाखल होत असेल तर त्याबाबत लोकांच्या मनात शंका उपस्थित होणं स्वाभाविकच आहे. संजय राऊत भाजपवर निशाणा साधत म्हणाले की, जे राष्ट्रवादीच्या विचारांचे नाहीत त्यांनाही हे कसं घडलं ? हा प्रश्न आहे.
महाराष्ट्रात अशी परंपरा कधीच नव्हती, तपास यंत्रणांचा गैरफायदा कोणीच घेतला नव्हता. हे देशासाठी आणि राजकारणासाठी घातक आहे. काँग्रेसच्या राजवटीतही टोकाचं राजकारण झालं नव्हतं. सरकार हे भाजपाचं आहे आमचं नाही. तपास यंत्रणा त्यांच्या हातात आहेत. अण्णा हजारे यांनी देखील शरद पवारांना क्लीन चिट दिली आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि कृषी महाराष्ट्र आणि कृषी क्षेत्रात खूप काम केलं आहे. शरद पवार यांचा पक्ष आणि विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे. पण ईडीने त्यांच्यासोबत चुकीचं केलं आहे असंच मी म्हणेन.
Visit : bahujannama.com