बहुजननामा ऑनलाइन टीम : संजय राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची बाजू खडतर मांडताना दिसले आहे. आता उद्यापासून राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे. त्यामुळे आता पत्रकार परिषद न घेता थेट सामनामधूनच बोलणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
इतके प्रयत्न करुन देखील भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. आता माझी जबाबदारी संपली आहे आणि मी चाणक्य नसून शिवसेनेचा योद्धा आहे असे देखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ज्या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा मी सांगितले होते की, अजित पवार नक्कीच परत येतील आणि हे खरे झाल्याचे राऊत यांनी सांगितले.
राज्यात सत्ता स्थापनेचा प्रश्न सुटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन होणार आहे. उद्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री म्हणून ठाकरेच येणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेसाठी लढताना किंवा भाजपबाबत बोलताना मी परिणामांची चिंता कधीच केली नाही फक्त काम करत राहिलो असे देखील संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेनेतील युती तुटल्यानंतर संजय राऊत यांनी वारंवार पत्रकार परिषदा घेऊन संजय राऊत यांनी भाजपला जेरीस आणले होते.
Visit : bahujannama.com