बहुजननामा ऑनलाइन टीम – सामनातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी परखड मुलाखत दिली आहे. त्यापूर्वी मुलाखतीचा प्रमुख खासदार संजय राऊत आणि त्यांच्या टूट वरून पोस्ट केला आहे . या मुलाखतीत राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही जशाच तसे उत्तर दिले आहे. सामना वर्तमानपत्रतून या मुलाखती तीनही भाग प्रसारित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे. राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी जनता हेच या सरकारचा केंद्रबिंदू असल्याचेचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यात रोजगाराच्या संधी वाढतील अशी व्यक्त केली.
शेतकरी आणि कष्टकरी हेच विकासाचा केंद्रबिंदू राहतील. महाराष्ट्रातील एकही उद्योग आता राज्याच्या बाहेर जाणार नाही. रोजगाराच्या संधी वाढतील. एमआयडीसीची अवस्था चांगली नाही. त्यात सुधारणा होईल हा शब्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून दिला. तसेच नाईट लाईफ म्हणजे फक्त मौजमजा छंद छंद नाहीत. श्रमणाऱ्या मुंबईची गरज आहे. सरकार त्यांच्या हितासाठीच राबवले जाईल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला ठाकरे यांनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात राज्याच्या विकासाचा रोड मॅप समोर मांडला आहे.
मुंबईतील काही पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत. त्यात बरीच गुंतागुंत आहे. ती गुंतागुंत सोडवावी लागेल आणि त्यांच्यात गुंतवणूक आणावी लागेल. त्या दृष्टीने काही आर्थिक संस्थांनी तयारी दर्शवली आहे पण येथे काही गोष्टी आम्हाला सोप्या करून द्या असं म्हणणं आहे. त्यांच्यात जो सर्वसामान्य मुंबईकर आहे तो पुनर्विकासाच्या प्रकल्पात अडकला आहे घर देऊन बसलेला आहे त्याचाही इमारती पडल्या आहेत.टान्झिस्ट कॅम्पमध्ये राहतोय त्याला हक्काची घरं आहेत. त्यांना लवकरात लवकर हक्काच्या घरात मिळणं हे मी ठरवलं, असेही ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तळमळीने मत मांडताना लोकमान्य टिळक यांची उदाहरणे दिली.
सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच
सर्वांच्या सहकार्यामुळे एकजुटीमुळे हे शक्य झालं. सगळ्यांनीच पहिल्या दिवसापासून सहकार्याची भूमिका घेतली. त्यांच्याही मनात असं होतं की वातावरण चांगलं झालं. चला आता कामाला लागूया. हे जे काही सहकार्य करत आहे तेथे महत्त्वाचा आहे संपूर्ण राज्यातील प्रशासन यंत्रणा हे पोलिस आहेत, महसूल विभाग आहे. सगळ्यांचे सहकार्य लागतंय म्हणून विनासायास हे एक वर्ष पार पडलं. आणि मला विश्वास आहे की पुढची चारही वर्ष नक्कीच आम्ही पार पाडू. सामन्याच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी अकरा दिवसांत सरकार पडणार आहे असं बोलले जात होते. या संदर्भात प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर देताना तसं बोलणाऱ्याचे दात पडत आलेत आता हे सरकार नक्कीच पाच वर्षे पूर्ण करणार तसंच सामन्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला अष्टांग नमस्कार घालतो.
मी संयमी आहे पण याचा अर्थ नामर्द नाही ठाकरेंचे शाब्दिक हल्ले
ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहे ही पद्धत निदान महाराष्ट्राची नाही. मी शांत आहे संयमी आहे पण याचा अर्थ मी नामर्द नाही अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबावर येणार असाल, मुलबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्या ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलबाळ आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला मूलबाळ आहे. कुटूंब आहे. तुम्ही धुतलेले तांदूळ नाहीत तुमची खिचडी कशी भिजवायची ते आम्ही शिजवू.
भाजपला इशारा
दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले त्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला व प्रत्यक्ष ठणकावले आहे. आम्ही देतो नावं आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला पूर्ण तयार आहे पण सुडाने जायचं का मग जनतेने आपल्याकडून कायम ठेवायची सूडाने वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा काढतो. तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागला. सीबीआयवर काय राज्याचा अधिकार नाही? असा सवाल ठाकरे यांनी विचारला आहे
संजय राऊत यांनी पोस्ट केलेला दुसरा प्रमुख मध्ये उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की मराठी महाराष्ट्रमध्ये गाडून त्यांच्यावर तुम्ही नाचणार? आम्ही ते उघडे डोळे करून सहन करू. ज्यांना ज्यांना मूलबाळ आहेत त्यांनी आरशात बघावं… तुम्हालाही मूलबाळ आहेत … तुम्हाला एक कुटुंब आहे तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाही जर मी मागे लागलो तर…. अशा गंभीर इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे .
तसंच राज्यात वाढीव बिल आंदोलनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले
मागील काही दिवसांपासून राज्यात वीज बिलावरून युद्ध पेटले आहे. भाजपने आंदोलन केले. राज ठाकरे यांच्या मनसेने वीज बिलाच्या मुद्द्यावर राज्यभरात प्रचंड मोठे मोर्चे काढले. त्यामुळे वीज बिलाच्या घटनेवर उद्धव ठाकरे काय सांगतात आणि भाजपा म्हणजे काय भाष्य करतात त्याबाबत उत्सुकता लागून आहे.
आडवं करायचं असेल तर बोलता कशाला – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
” शेण, गोमुत्र, आडवे करू तिडवे करू अशी भाषा मुख्यमंत्र्यांना शोभणारी आहे का? सामान्य जनतेलाही हे योग्य आहे कि नाही ते कळत. आडवं करायचं असेल तर बोलता कशाला गरजेल तो पडेल काय? त्यामुळे जे काही त्यांना वाटतं करावं ते करून टाकावं. ”
मुलाखतीच्या प्रोमोत काय म्हणाले उद्धव ठाकरे
४४ सेकंदाचा प्रोमो आहे. उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात? काय उत्तरे देतात? याची झलक दिसत आहेत. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे देखील काही प्रश्नांवर विचार केल्याचं दिसत आहे. मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्या पलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा देत उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, की “ठीक आहे हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे जाईल” असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका, कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कोणी कितीही आडवे आले त्या येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल.
महाविकासआघाडीला वर्ष पूर्ण होत आहे ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या “अभिनंदन” मुलाखतीचा प्रमुख पोस्ट करताना राऊत यांनी “उद्या धमाका” असे कॅप्शन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा देत म्हणाले, की तसंच बायका, मुलं आम्हाला पण आहे म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो आणि त्यांच्या धमक्यांना घाबरतो. त्यांच्या धमक्यांना घाबरलं या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहू नये. व्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, कोरोनाच्या संकटावर मात करावी. दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये.