बहुजननामा ऑनलाइन टीम –बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिनं मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी पहिल्यांदाच या वादवार प्रतिक्रिया दिली आहे. सावधान सावधान असं म्हणत सूचक ट्विट त्यांनी केलं आहे. नीतेश राणे यांनी ट्विट करत लिहिलं की, “सावधान! सावधान! कंगना तर एक बहाणा आहे. सुशांत सिंह राजूपत आणि दिशा सालियान प्रकरणावरून लक्ष विचलित करायचा हा प्रयत्न आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचं आहे. बाकी काही नाही” असं त्यांनी म्हटलं आहे.
Alert! Alert!
Kangana toh ek bahana hai..
SSR aur disha case Se dhyan hatana hai..
Baby penguin ko bachana hai..Baki kuch nahi!!
— nitesh rane (@NiteshNRane) September 5, 2020
यानंतर मुंबई पोलिसांवरील टीकेचं प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन कंगनानं आपला सूर मवाळ केला आहे. माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईवरचं प्रेम सिद्ध करण्याची मला गरज नाही. मुंबईनं मला यशोदा मातेसारखं प्रेम दिलं आहे. जय मुंबई जय महाराष्ट्र असंही ती म्हणाली आहे.
मला गुंड आणि मुव्ही माफीयांपेक्षा जास्त भीती ही मुंबई पोलिसांची वाटते. मला हिमाचल प्रदेश किंवा केंद्र सरकारची सुरक्षा द्या. कृपा करून मुंबई पोलिसांची नको. असं कंगनानं म्हटलं होतं. यानंतर राजकीय पक्षांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अनेक कलाकारांनी तिला खडेबोल सुनावले आहेत. राज्याचे गृहमंत्री देखील असं म्हणाले आहेत की, कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही.