मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईवरुन केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट केले आहे. खासदार संजय राऊत यांच्याा वादात कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली. त्यामुळे ती टीकेची धनी ठरली आहे. त्यानंतर आतानितेश राणे यांनी शायरीच्या अंदाजात ट्विट करुन निशाणा साधला आहे.
कंगना तर फक्त एक कारण आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या प्रकरणावरुन लक्ष हटवायचे आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही असे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या संपूर्ण वादात खासकरुन शिवसेना नेत्यांकडून कंगनाला लक्ष्य केले जात आहे. संजय राऊत यांनी कंगनाला सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे असती तर आमच्या रणरागिणी तिचे थोडाब फोडल्याशिवाय राहणार नाहीत.
Alert! Alert!
Kangana toh ek bahana hai..
SSR aur disha case Se dhyan hatana hai..
Baby penguin ko bachana hai..Baki kuch nahi!!
— nitesh rane (@NiteshNRane) September 5, 2020
मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणार्या कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. तिने मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असे म्हटले होते.