नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फाशीची शिक्षा सुनावलेले निर्भयाचे चार गुन्हेगार विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना आज सकाळी साडेपाच वाजता तिहार कारागृहात अखेर फासावर लटकवण्यात आले. सात वर्ष, तीन महिने आणि तीन दिवसांनंतर निर्भयाला न्याय मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने निर्भयाच्या दोषींची फाशी टाळण्यासाठी दाखल केलेली याचिका रात्री उशीरा फेटाळण्यात आली. ज्यानंतर दोषींच्या वकीलांना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, ती सुद्धा न्यायालयाने पहाटे फेटाळली. तिहार जेलचे महासंचालक संदीप गोयल यांनी सांगितले की, चारही दोषींना सकाळी ठिक 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले आहे. सकाळी 5:10 मिनिटांनी निर्भयाच्या दोषींना फाशीच्या ठिकाणी आणण्यात आले. यावेळी तिहार जेलच्या बाहेर सुरक्षा दलांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जेल नंबर तीनच्या बाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती.
2012 Delhi gang-rape case: All 4 death row convicts have been hanged at Tihar jail. pic.twitter.com/xOFJirPf8A
— ANI (@ANI) March 20, 2020
पहाटे 4:22 वाजता
तिहार जेलच्या अधिकार्यांनी सांगितले की, जल्लादला उठवण्यात आले आहे आणि जेलच्या अधिकार्यांची बैठक होत आहे.
पहाटे 3:48 वाजता
याचिका फेटाळल्यानंतर दोषींचे वकील एपी सिंह यांनी न्यायालयाकडे दोषींना शेवटचे भेटण्यासाठी 5-10 मिनिटांची वेळ मागितली. सुप्रीम कोर्टाने यास नकार देत म्हटले की ते सॉलिसिटर जनरल पाहितील. तर, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले की, जेलचे नियम यासाठी परवानगी देत नाही आणि हे दोन्ही पक्षकारांसाठी दुखद असेल.
पहाटे 3:45 वाजता
सुप्रीम कोर्टाने दोषींची याचिका फेटाळल्यानंतर निर्भयाच्या आईने समाधान व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, मी समाधानी आहे. अखेर आमच्या मुलीला न्याय मिळाला आहे. संपूर्ण देश या गुन्ह्यामुळे व्यथीत होता, आज देशाला न्याय मिळाला आहे. शेवटी दोषींना फासावर लटकावले जाणार आहे. मी सर्व लोक विशेषता आपल्या समाजातील मुलींना आणि महिलांना धन्यवाद देते.
पहाटे 3:43 वाजता
सुप्रीम कोर्टाने चारही दोषींपैकी एक पवन गुप्ताची याचिका फेटाळली. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळताना म्हटले की, फाशी रोखण्यास कोणताही आधार दिसत नाही.
पहाटे 3:14 वाजता
वकील एपी सिंह यांनी म्हटले की, मला माहित आहे की त्यांना फाशी होईल, पण ती दोन किंवा तीन दिवसांसाठी रोखता येणार नाही का, ज्यामुळे दोषी पवनचा जवाब नोंदवला जाऊ शकतो.
पहाटे 3:10 वाजता
जस्टिस भूषण यांनी विचारले की, कोणत्या आधारावर एपी सिंह याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान देत आहात? ते पुढे म्हणाले, एपी सिंह ते मुद्दे सांगत आहेत, ज्यावर अगोदर चर्चा झाली आहे.
पहाटे 3:08 वाजता
निर्भया प्रकरणातील दोषी पवनकडून वकील एपी सिंह यांनी न्यायालयाच्या समोर त्याच्या शाळेचा दाखला, शाळेचे रजिस्टर आणि हजेरी रजिस्टर सादर करत दावा केला की, गुन्हा घडला तेव्हा तो अल्पवयीन होता. यावर जस्टिस भूषण यांनी म्हटले की, ही सर्व कागदपत्र कोर्टासमोर यापूर्वीही आणण्यात आली आहेत.
मध्यरात्री 2:48 वाजता
दोषींची फाशीची शिक्षा रोखण्यासाठी आणि राष्ट्रपतींद्वारे दया याचिका फेटाळलच्या विरोधात सुप्रीम कोर्टांत दाखल याचिकेवर वरिष्ठ न्यायालयाने सुनावणी सुरू केली. यापूर्वी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सुद्धा सुप्रीम कोर्टात पोहचले होते.
मध्यरात्री 2:13 वाजता
दोषींच्या वकीलाने फाशीची शिक्षा रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. निर्भयाचे आई-वडीलसुद्धा कोर्टात पोहचले होते.
मध्यरात्री 2:04 वाजता
सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारला भेटल्यानंतर दोषींच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. एपी सिंह यांनी सांगितले की, आम्ही डेथ वॉरंट स्थगित करणे आणि तात्काळ सुनावणीची मागणी करणार आहोत. आम्ही सुप्रीम कोर्टात याचिक दाखल करत आहोत, कोर्ट उघडे आहे, काम करत आहे.
मध्यरात्री 1:40 वाजता
दोषींचे वकील एपी सिंह सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रारच्या निवास्थानी पोहचले. सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सकाळी तीन वाजता सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
मध्यरात्री 1:23 वाजता
हायकोर्टात फटका मिळाल्यानंतर दोषींचे वकील एपी सिंह यांनी सांगितले की, हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळताच सुप्रीम कोर्टात जाणार. मी रजिस्ट्रारशी बोललो आहे, मी त्यांना भेटण्यासाठी जणार आहे.