नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या कुटुंबियांकडून एक नवीन युक्ती केली जात आहे. आता चारही दोषींच्या कुटुंबाने राष्ट्रपतींना आपल्यासाठी इच्छा मृत्यूची मागणी केली असून एकूण १३ लोकांनी ही मागणी केली आहे. यात मुकेशच्या कुटुंबातील २, पवन-विनयच्या ४-४ आणि अक्षयच्या कुटुंबातील ३ सदस्य सहभागी आहे. अजूनतरी कायदेशीर पत्राला काहीही अर्थ नाही आणि कायदा अशा इच्छा मृत्यूची तरतूदही करत नाही.
२० मार्चला होणार आहे फाशी
पटियाला हाऊस कोर्टाने निर्भयाच्या दोषींसाठी डेथ वॉरंट जारी केले असून दोषींना २० मार्चला फाशी होणार आहे. निर्भयाच्या दोषींना २० मार्चला सकाळी ५:३० वाजता फाशी दिली जाणार असून याअगोदरच कोर्टाने डेथ वॉरंट जारी केला होता. म्हणूनच या अगोदर दोषींची फाशी ३ वेळा टळली. दोषींनी शेवटच्या क्षणापर्यंत कायदेशीर पर्यायांचा वापर करत राहिले. पण पवनची दया याचिका राष्ट्रपतींकडून फेटाळली गेल्यानंतर चारही दोषींचे सगळे कायदेशीर पर्याय संपले आहेत.