नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणाच्या फाशीतून वाचण्यासाठी निर्भयाचा आरोपी प्रत्येक युक्तीचा अवलंब करीत आहे. आरोपी विनय शर्माने आणखी एक डाव केला आहे. त्याचे वकील एपी सिंग यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. या अर्जात असे म्हटले आहे की, 29 जानेवारीला दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी जेव्हा विनय याची दया याचिका फेटाळून लावण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारस केली तेव्हा ते मंत्री नव्हते किंवा आमदार नव्हते.
आरोपी विनय शर्मा याचा वकील एपी सिंग यांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांनी 30 जानेवारी रोजी व्हाट्सअँपच्या माध्यमातून आपली सही पाठविली होती. अर्जामध्ये असे म्हटले आहे की, दया याचिका फेटाळून लावणे बेकायदेशीर आणि घटनात्मक आहे, कारण त्यावेळी दिल्लीत निवडणुकांसाठी आचार सहिता चालु होती. अर्जात, आयोगाने कायदेशीर दखल घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, तिहार कारागृहात असलेल्या आरोपी विनय कुमारने स्वत: ला जखमी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. विनय कुमारने स्वत: ला भिंतीवर आदळले. तुरूंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेत विनय किरकोळ जखमी झाला आहे.
या चारही आरोपींना 3 मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येईल. पटियाला हायकोर्टाने 17 फेब्रुवारीला नवीन डेथ वॉरंट देण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे. हे प्रकरण राष्ट्रीय राजधानीत डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय महिलेच्या बलात्कार आणि हत्येशी संबंधित आहे.
नुकत्याच कोर्टाच्या आदेशाबद्दल समाधान व्यक्त करत निर्भयाच्या आईने सांगितले की, मी समाधानी व आनंदी आहे. मला आशा आहे की अखेरीस दोषींना फाशी देण्यात येईल. हा खटला डिसेंबर २०१२ मध्ये राष्ट्रीय राजधानीमध्ये एका 23 वर्षीय मुलीच्या सामूहिक बलात्कार आणि हत्येशी संबंधित आहे.
31 जानेवारी रोजी मुकेश कुमार सिंग (32), पवन गुप्ता (32), विनय कुमार शर्मा (25) आणि अक्षय कुमार (26) या चार दोषींना पुढील आदेश येईपर्यंत खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली गेली.