नवी दिल्ली: वृत्तसंस्था – देशाची राजधानी दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये प्रसिद्ध निर्भया गँगरेप प्रकरण आणि खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर दोषी सुटका करून घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. पण त्यांची प्रत्येक युक्ती अपयशी ठरत आहे. अक्षय कुमारसिंग याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. एक दिवसांपूर्वी बुधवारी अक्षय कुमार सिंग याने आपल्या वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात सुधारात्मक याचिका दाखल केली होती.
Supreme Court dismisses curative petition of Akshay Kumar Singh, one of the convicts in Delhi 2012 gangrape case. pic.twitter.com/mhUuv9eZPF
— ANI (@ANI) January 30, 2020
निर्भया सामूहिक बलात्काराचा दोषी अक्षय कुमार सिंग यांच्याकडे राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा अजूनही पर्याय आहे. मुकेश आणि विनय यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुधारात्मक याचिका दाखल करणारा अक्षय कुमार सिंग हा तिसरा दोषी आहे.१ फेब्रुवारी रोजी मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय कुमार सिंग या चारही दोषींना फाशी देण्यासाठी खालच्या कोर्टाने १७ जानेवारीला दुसऱ्यांदा ब्लॅक वॉरंट जारी केला होता. कोर्टाने यापूर्वी ७ जानेवारी रोजी फाशीचे वॉरंट जारी केले होते.
आतापर्यंत मुकेश एकमेव अशी व्यक्ती आहे ज्याने सर्व कायदेशीर पर्यायांचा प्रयत्न केला आहे. त्याची दया याचिका 17 जानेवारीला राष्ट्रपतींनी फेटाळली आणि सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या विरोधात बुधवारी त्यांचे अपील फेटाळून लावले. न्यायमूर्ती आर भानुमति यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठाने मुकेश यांची याचिका फेटाळून लावत म्हटले की त्वरित विचार आणि दया याचिका त्वरित डिसमिस करण्याचा अर्थ असा नाही की राष्ट्रपतींनी त्याचा विचार केला नाही.