नवी दिल्ली : वृत्तासंस्था – २०१२ मध्ये निर्भया गँगरेप आणि हत्या प्रकरणात दोषी अक्षयने नवीन दया याचिका दाखल केली आहे. नवीन याचिकेत अक्षयने त्याची पहिली याचिका फेटाळली गेली असल्याचे म्हटले आहे. ज्यात सगळे तथ्य नव्हते. निर्भया प्रकरणातील चारही दोषींना तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. तसेच त्यांचे डेथ वॉरंटही जारी केले आहे.
2012 Delhi gangrape case: One of the convicts, Akshay has moved mercy petition claiming that his earlier petition that was dismissed did not have all the facts. pic.twitter.com/RArzA5mUjZ
— ANI (@ANI) February 29, 2020
तर दुसरीकडे पवन कुमार गुप्ताने क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी होणार आहे. पवनच्या याचिकेवर न्यायमूर्ती एन.वी. रमण यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून सुनावणी होणार आहे. पवनने फाशीची शिक्षा बदलून जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पवनचे वकील ए.पी. सिंह यांनी सांगितले की, पवनने सुधारात्मक याचिका दाखल करत फाशीची शिक्षा देऊ नये. पवनने अद्याप सुधारात्मक याचिका दाखल करण्याचा आणि राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय वापरला नव्हता.