मुंबई : Nilesh Rane On Chhagan Bhujbal | छगन भुजबळांना आवरलं पाहिजे. मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil( यांचे आंदोलन (Maratha Reservation Andolan) सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला (BJP) डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही, असे म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना सुनावले आहे.
या संदर्भात निलेश राणे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाडी करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो, पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होणार नाही. कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे, असा इशारा राणे यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते भुजबळ…
भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अब की बार ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांसमोर आव्हान निर्माण झाले. या घोषणेमुळे एकप्रकारे एनडीए आघाडीचे नुकसान झाले. एनडीए ४०० पार गेल्यामुळे आपल्या देशाचे संविधान बदलले जाणार नाही, ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकीनऊ आले. विधानसभेला असेच होऊ शकते, असे भुजबळ म्हणाले होते. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या या वक्तव्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे.