बहुजननामा ऑनलाईन – मध्यरात्रीपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हेजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे तर अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वाढलेला वेग याचा परिणाम म्हणून कोकणासह मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वसई विरार, कल्याण, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. सध्या पाऊस सक्रिय झाला असून गेली तीन – चार दिवसांपासून राज्यता सर्वदूर पाऊस सुरु आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीत दमदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.
आता महारष्ट्रासह हरियाणा, पंजाब, दिल्ली, बिहार आणि उत्तरप्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर ३१ जुलै बुधवारी आणि १ ऑगस्ट गुरुवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, तर २ ऑगस्ट शुक्रवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या कालावधीत मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथा परिसरात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य भारतातील छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये वातावरणातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जोरदार पाऊस पडणार आहे. राज्यात पावसाचा मुक्काम पुढील सात दिवसापर्यंत राहणार आहे. तर मुंबईत पाऊस मंगळवारनंतरच विश्रांती घेणार आहे. आणि पुन्हा ऑगस्टमध्ये मुंबईसह परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.