मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आणिबाणीचा दिवस हा भाजपा काळा दिन म्हणून पाळते. पण भाजपाच्या मुख्यमंत्र्याने मुख्यमत्री पदाची शपथ घेतली हे जनतेलाही कळून दिले नाही. भाजपाने राज्यपाल, राष्ट्रपतींचा दुरोपयोग केला असून राज्यपालांचा काळा बाजार केला आहे, असा घणाघातील आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत केला आहे.
देशाच्या इतिहासात असा काळा दिवस पाहिला नव्हता. भाजपाने काल राष्ट्रपती भवन आणि राज्यपाल यांचा काळा बाजार केला़ काळा दिवस, लोकशाहीची हत्या हा शब्द त्यांनी वापरुन नये. जर भाजपाकडे बहुमत होते तर, त्यांनी २०१४ प्रमाणे वाजत गाजत शपथविधी का केला नाही. सर्व जनता झोपलेली असताना तुम्ही असा गुपचुप शपथविधी का घेतला़ म्हणूनच शपथविधीनंतर २ -४ जणांनी एकमेकांना लाडु भरविले. पण त्यांच्या घशा खालून ते अजून उतरले नाहीत.
पाच आमदारांच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद हा अतिशय चुकीचा व्यवहार अजित पवार यांनी केला आहे, असे सांगून राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकी अगोदरही भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. अनेकांना पक्षात घेतले. त्यांना जनतेने घरी बसविले. अजित पवार यांना फोडण्याचा हा त्यांचा अखेरचा डाव होता. तो आता फसला आहे. अजित पवार यांच्याबरोबर ५ -२५ आमदार येतील असे भाजपाचा वाटत होते. पण त्यांनी आता झोपेतून बाहेर पडावे. जे आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेल. ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत आले आहेत.